शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:32 IST

India-Syria political relations: भारताने पहिल्यांदाच सीरियाचे अंतरिम सरकार असलेल्या अल-शारा सरकारशी औपचारिक चर्चा केली

India-Syria political relations: जगभरात सध्या संघर्षाचे वातावरण सुरू आहे. अनेक देशांचे एकमेकांशी युद्ध किंवा हेवेदावे सुरू आहेत. तशातच भारत सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत पहिल्यांदाच सीरियाच्या अंतरिम सरकारशी औपचारिक चर्चा केली आहे. एकेकाळी अल-कायदाशी संबंधित असलेले अहमद अल-शारा या सरकारचे नेतृत्व करत आहेत. भारताच्या वतीने, परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका (WANA) विभागाचे संचालक सुरेश कुमार यांनी दमास्कसमध्ये सीरियाच्या वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली.

थेट संवादाची पहिलीच वेळ

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बशर अल-असद सरकारच्या पतनानंतर भारताचा तेथील नवीन सरकारशी थेट संवाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या या राजकीय बैठकीचे वृत्त सीरियाची सरकारी वृत्तसंस्था SANA ने दिले आहे. मात्र, भारत सरकारकडून यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

बैठकीचे मुद्दे कुठले?

सुरेश कुमार यांनी सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद अल-शैबानी आणि आरोग्य मंत्री मुसाब अल-अली यांच्याशी विशेष चर्चा केली. चर्चेचा केंद्रबिंदू आरोग्य क्षेत्र, औषध उद्योग आणि वैद्यकीय प्रशिक्षण हे मुद्दे होते. अहवालानुसार, आरोग्य तंत्रज्ञान आणि औषधांच्या क्षेत्रात भारतासोबत मजबूत भागीदारीची आशा सीरियाने व्यक्त केली आहे. याशिवाय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम आणि शिष्यवृत्ती यांसारखे शैक्षणिक कार्यक्रम पुढे नेण्यासाठी एक करार देखील झाला आहे. भारताने सीरियाच्या डॉक्टरांच्या प्रशिक्षणात आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रशिक्षणात मदत करत राहण्याचे आश्वासन दिले.

भारताला फायदा काय?

भारताच्या या पुढाकारामागे सीरियाची सामरिक स्थिती देखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे. हा देश तुर्की, इराक, जॉर्डन, इस्रायल आणि लेबनॉन सारख्या महत्त्वाच्या देशांना लागून आहे. याशिवाय, अमेरिकेने सीरियावरील काही निर्बंध अलिकडेच काढून टाकले आहेत आणि ट्रम्प व अल-शरा बैठक देखील भारताच्या भूमिकेवर प्रभाव टाकू शकते.

भारत-सीरिया संबंध

सीरिया आणि भारत यांच्यातील संबंध नेहमीच मजबूत आहेत. भारताने नेहमीच पॅलेस्टाईन मुद्द्यावर आणि गोलान हाइट्सवरील सीरियाच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे. असद राजवटीत, सीरियाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर, विशेषतः काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर भारताला पाठिंबा दिला होता. कोविड काळात, भारताने २०२१ मध्ये सीरियाला १० टन औषधे पाठवली आणि २००० टन तांदळाची आपत्कालीन मदतही केली होती.

टॅग्स :SyriaसीरियाIndiaभारतAmericaअमेरिकाPoliticsराजकारण