शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

खास प्लॅन...! भारत-बांगलादेशमधील कटुता दूर होणार? होऊ शकते जयशंकर-मोहम्मद तौहिद हुसेन यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 19:57 IST

जर तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची नियोजित बैठक झाली, तर पाच महिन्यांतील ही त्यांची दुसरी बैठक असेल...

बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन पुढील आठवड्यात ओमानची राजधानी असलेल्या मस्कट येथे आयोजित हिंद महासागर परिषदेदरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेऊ शकतात. बांगलादेश, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये आणखी तणाव वाढू नये या उद्देशाने, एक संदेश देण्यासाठी या बैठकीचा वापर करू शकतो.

8 वी हिंद महासागर परिषद (आयओसी 2025) 16-17 फेब्रुवारीला मस्कट येथ होत आहे. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी गेल्या महिन्यात बांगलादेशच्या परराष्ट्र सल्लागारांना परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. जर तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची नियोजित बैठक झाली, तर पाच महिन्यांतील ही त्यांची दुसरी बैठक असेल.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात झाली होती बैठक -यापूर्वी, तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची बैठक गेल्या वर्षी सप्टेंबरमहिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सत्रादरम्यान न्यूयॉर्क येथे झाली होती. बांगलादेशात विद्यार्थी आणि जनतेने केलेल्या उठावामुळे ५ ऑगस्टला शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार कोसळले होते. यानंतर,ची ही चर्चा परस्पर हितांच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासंदर्भात झाली होती. 

भारतीय परराष्ट्र सचिवांनी केला होता बांगलादेश दौरा -न्यू यॉर्क येथील चर्चेनंतर, भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ढाका दौरा केला होता. यावेळी त्यांनी बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जसीम उद्दीन यांची भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस, परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन आणि लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांचीही भेट घेतली. तेव्हा दोन्ही देशांत संबंध सामान्य करण्यासंदर्भात आणि ऑगस्टनंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. महत्वाचे म्हणजे, बांगलादेशातील सत्तापालटानंतर शेख हसीना देखील भारतात आहेत. यामुळेही दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले आहेत.   बांगलादेशने अनेक वेळा त्यांना परत पाठविण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर