शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

73 टक्के लोकांची पाकिस्तानपासून वेगळं होण्याची इच्छा, सर्व्हे करणा-या वृत्तपत्राला पाकिस्तान सरकारने ठोकलं टाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:33 IST

73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनंतर, पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने कोणताही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळं ठोकलं आहे. 

ठळक मुद्देपाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वात जास्त विक्री होणारं उर्दू वृत्तपत्र डेली मुजादालवर पाकिस्तान सरकारने बंदी आणली आहेरावलकोट येथून प्रसिद्द होणा-या या वृत्तपत्राने पीओकेमधील लोकांशी संवाद साधत एक सर्व्हे केला होता 73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहेहा सर्व्हे प्रकाशित करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सरकारने सर्वात आधी आपल्याला नोटीस पाठवून धमकावलं असल्याचं संपादक हारिस क्वादिर यांनी सांगितलं

इस्लामाबाद, दि. 13 - पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वात जास्त विक्री होणारं उर्दू वृत्तपत्र डेली मुजादालवर पाकिस्तान सरकारने बंदी आणली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथून प्रसिद्द होणा-या या वृत्तपत्राने पीओकेमधील लोकांशी संवाद साधत एक सर्व्हे केला होता. सर्व्हेदरम्यान पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचं काय मत आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. रिपब्लिक चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, 73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनंतर, पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने कोणताही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळं ठोकलं आहे. 

रिपब्लिक चॅनेलने यानंतर वृत्तपत्राचे संपादक हारिस क्वादिर यांच्याशी संवाद साधला. जेव्हा त्यांना लोकांचं स्वातंत्र्यांवर काय म्हणणं आहे असं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'आम्ही लोकांना दोन वेगवेगळे प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता की 1948 मध्ये काश्मीरला मिळालेला दर्जा बदलला जावा असं त्यांना वाटतं का ? या प्रश्नावर अनेकांचं सकारात्मक उत्तर होतं'. त्यांनी सांगितलं की, दुसरीकडे 73 टक्के लोक काश्मीर पाकिस्तापासून स्वतंत्र झाला पाहिजे या मताचे आहेत. 

हा सर्व्हे प्रकाशित करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सरकारने सर्वात आधी आपल्याला नोटीस पाठवून धमकावलं असल्याचं संपादक हारिस क्वादिर यांनी सांगितलं आहे. यानंतर त्यांनी माझ्या कार्यालयाला टाळं ठोकलं असं संपादक हारिस क्वादिर बोलले आहेत. 

जवळपास 10 हजार लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेसाठी पाच वर्षांचा वेळ लागला. या सर्व्हेत जवळपास 73 टक्के लोकांनी पाकिस्तानपासून वेगळं होण्यावर सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून स्वातंत्र्य मिळावं यासाठी याआधीही अनेकांनी आवाज दिला आहे. सिंधू आणि बलुचिस्तानमध्येही स्वातंत्र्याची मागणी झाली होती. 

वृत्तपत्राने सर्व्हे प्रकाशित केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तान सरकारने सर्व्हेचा धसका घेत थेट वृत्तपत्रावरच कारवाईचा बडगा उगारला आहे. कोणताही पूर्वसूचना न देता पाकिस्तान सरकारने सर्वात जास्त खप असलेलं हे वृत्तपत्र बंद केलं आहे. सरकारच्या निर्णयावर लोकांनी रोष व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान