शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
2
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
3
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
5
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
6
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
7
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
8
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
9
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
10
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
11
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
12
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
13
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
14
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
15
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
16
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
17
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
18
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
19
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
20
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

73 टक्के लोकांची पाकिस्तानपासून वेगळं होण्याची इच्छा, सर्व्हे करणा-या वृत्तपत्राला पाकिस्तान सरकारने ठोकलं टाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:33 IST

73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनंतर, पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने कोणताही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळं ठोकलं आहे. 

ठळक मुद्देपाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वात जास्त विक्री होणारं उर्दू वृत्तपत्र डेली मुजादालवर पाकिस्तान सरकारने बंदी आणली आहेरावलकोट येथून प्रसिद्द होणा-या या वृत्तपत्राने पीओकेमधील लोकांशी संवाद साधत एक सर्व्हे केला होता 73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहेहा सर्व्हे प्रकाशित करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सरकारने सर्वात आधी आपल्याला नोटीस पाठवून धमकावलं असल्याचं संपादक हारिस क्वादिर यांनी सांगितलं

इस्लामाबाद, दि. 13 - पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वात जास्त विक्री होणारं उर्दू वृत्तपत्र डेली मुजादालवर पाकिस्तान सरकारने बंदी आणली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथून प्रसिद्द होणा-या या वृत्तपत्राने पीओकेमधील लोकांशी संवाद साधत एक सर्व्हे केला होता. सर्व्हेदरम्यान पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचं काय मत आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. रिपब्लिक चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, 73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनंतर, पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने कोणताही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळं ठोकलं आहे. 

रिपब्लिक चॅनेलने यानंतर वृत्तपत्राचे संपादक हारिस क्वादिर यांच्याशी संवाद साधला. जेव्हा त्यांना लोकांचं स्वातंत्र्यांवर काय म्हणणं आहे असं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, 'आम्ही लोकांना दोन वेगवेगळे प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता की 1948 मध्ये काश्मीरला मिळालेला दर्जा बदलला जावा असं त्यांना वाटतं का ? या प्रश्नावर अनेकांचं सकारात्मक उत्तर होतं'. त्यांनी सांगितलं की, दुसरीकडे 73 टक्के लोक काश्मीर पाकिस्तापासून स्वतंत्र झाला पाहिजे या मताचे आहेत. 

हा सर्व्हे प्रकाशित करण्यात आल्यानंतर पाकिस्तान सरकारने सर्वात आधी आपल्याला नोटीस पाठवून धमकावलं असल्याचं संपादक हारिस क्वादिर यांनी सांगितलं आहे. यानंतर त्यांनी माझ्या कार्यालयाला टाळं ठोकलं असं संपादक हारिस क्वादिर बोलले आहेत. 

जवळपास 10 हजार लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेसाठी पाच वर्षांचा वेळ लागला. या सर्व्हेत जवळपास 73 टक्के लोकांनी पाकिस्तानपासून वेगळं होण्यावर सहमती दर्शवली आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून स्वातंत्र्य मिळावं यासाठी याआधीही अनेकांनी आवाज दिला आहे. सिंधू आणि बलुचिस्तानमध्येही स्वातंत्र्याची मागणी झाली होती. 

वृत्तपत्राने सर्व्हे प्रकाशित केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तान सरकारने सर्व्हेचा धसका घेत थेट वृत्तपत्रावरच कारवाईचा बडगा उगारला आहे. कोणताही पूर्वसूचना न देता पाकिस्तान सरकारने सर्वात जास्त खप असलेलं हे वृत्तपत्र बंद केलं आहे. सरकारच्या निर्णयावर लोकांनी रोष व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तान