शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

वांशिक दंगलींमुळे म्यानमारमधील 500 हिंदूंचे बांगलादेशात पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 09:39 IST

म्यानमारच्या रखाईन प्रांतामध्ये सुरू असणा-या वांशिक तणावाची झळ सर्वच समुदायांना बसू लागली आहे. रोहिंग्यांबरोबर तेथील हिंदूंनाही जीव मुठीत धरुन म्यानमार सोडून जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात ५०० हिंदूंनी बांगलादेशात पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई, दि.5- म्यानमारच्या रखाईन प्रांतामध्ये सुरू असणा-या वांशिक तणावाची झळ सर्वच समुदायांना बसू लागली आहे. रोहिंग्यांबरोबर तेथील हिंदूंनाही जीव मुठीत धरुन म्यानमार सोडून जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात ५०० हिंदूंनी बांगलादेशात पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे. म्यानमारच्या राखिन प्रांतामध्ये मुस्लीम म्हणजेच रोहिंग्या समुदाय बहुसंख्येने राहतो, त्या पाठोपाठ रखाईन बौद्ध, मॉन आणि हिंदूंची वस्ती या प्रांतात मोठी आहे. बहुवंशीय आणि बहुधर्मीय म्यानमारमध्ये तणावाचा प्रसंग नेहमी येत असतात मात्र २५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या हत्या आणि जाळपोळीच्या सत्राने उग्र रुप धारण केले आहे. राखिनची राजधानी सित्वेच्या आसपासच्या प्रदेशात तसेच मंगडाऊ गावाजवळ रोहिंग्यांच्या प्रदेशात जाळपोळ झाली आहे, म्यानमार सरकारच्या आणि लष्कराच्या मतानुसार या तणावाला रोहिंग्याच जबाबदार आहेत. या जाळपोळीमुळे सर्वच धर्मीय सुरक्षित जागेत जाऊन राहण्याचा प्रयत्न करत आहेत. बौद्ध लोकांनी बौद्ध मठांमध्ये आश्रय घेतला तर हिंदूंनी शेल्टर होमचा आश्रय घेतला आहे. गेल्या आठवडाभरात ९० हजार रोहिंग्यांनी राखिन सोडल्याचे सांगण्यात येत असून बांगलादेशात कॉक्स बझारमधून ५०० हिंदू गेल्याचे स्पष्ट होत आहे. बहुतांश लोक म्यानमार आणि बांगलादेशच्या मध्ये असणा-या नेफ नदीतून रात्रू बोटीतून सीमा ओलांडत आहे. या धोकादायक प्रवासातही सुमारे २५ लोकांचे प्राण गेले आहेत. म्यानमार सरकार लवकरात लवकर शेल्टर होममध्ये राहणा-या हिंदू व इतर धर्मियांना पुन्हा घरी येऊन राहता येईल अशी स्थिती निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आंग सान सू ची यांच्या सरकारने वांशिक तणाव थांबवावा असे आंतराराष्ट्रीय नेत्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या म्यानमार भेटीत या विषयावर चर्चा करतील असे सांगण्यात येते. सध्या भारतात ४० हजार रोहिंग्या बेकायदेशीररित्या रहात असून त्यांना परत पाठवण्याचा विचार सरकार करत आहे.