शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

पाकिस्तानकडून 34 भारतीय मच्छीमारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 10:21 IST

पाकिस्तानने भारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्दे पाकिस्तानने भारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी नौदलाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

कराची - पाकिस्ताननेभारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांनाअटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी नौदलाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या मॅरीटाइम सिक्यॉरिटी एजेन्सीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांसह 6 बोटीदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. 

सर्व मच्छीमारांना स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी नौदला अंतर्गत कार्यरत असलेल्या मॅरीटाइम सिक्यॉरिटी एजेन्सीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मच्छीमारांना न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आधी जानेवारी महिन्यात पाकिस्तानी नौदलाने काही भारतीय मच्छीमारांना अटक केली होती.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एप्रिल महिन्यात 4 टप्प्यांमध्ये 360 भारतीय मच्छीमारांना भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने कराचीतील लांधी आणि मालिर येथील तुरूंगातून 250 भारतीय मच्छीमारांची तीन टप्प्यांमध्ये सुटका केली होती. भारतीय मच्छीमारांना सागरी हद्द ओलांडल्यावरून यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानी नौदलाने अटक केली आहे. 

श्रीलंकन नौदलाकडून 10 भारतीय मच्छीमारांना अटक

सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने 10 भारतीय मच्छीमारांना कटचथिऊ येथे काही दिवसांपूर्वी अटक केली होती.  रामनाथपुरम येथील लहान बेट असणाऱ्या कटचथिऊजवळील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने पकडले. त्यांच्याकडील बोट सुद्धा जप्त केली होती. संबंधित मच्छीमार तामिळनाडूमधील थानगचिमदाम येथील रहिवासी आहेत. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या नौदलाकडून एका भारतीय मच्छीमाराला कथितरित्या ठार करण्यावरून थानगचिमदाम येथे शेकडो मच्छीमारांनी निदर्शने केली होती. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्यानंतर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी एकमेकांच्या तुरुंगातील मच्छीमारांची सुटका करण्याचा सामंजस्य करार केला. त्यानुसार श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या अनेक भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली होती.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतArrestअटक