शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
2
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
3
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
4
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
5
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
6
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
7
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
8
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
9
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
10
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
11
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
12
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
13
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
14
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
15
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
16
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
17
Hero चा धमाका! ४ ते १० वर्षीय मुलांसाठी लॉन्च केली नवी E-Bike; किंमत पाहून थक्क व्हाल
18
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
19
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
20
Messi India Tour: १०० कोटींचे जेट, १०० कोटींचे घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
Daily Top 2Weekly Top 5

थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 06:20 IST

राजदूत बोलावले परत; युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचा कंबोडिया-थायलंड सीमाभागातील आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

सुरिन : थायलंड व कंबोडियातील संघर्षाने उग्ररूप धारण केल्याने सीमा भागाचे युद्धभूमीत रूपांतर झाले आहे. तीन दिवसांपासून दोन्ही देशाच्या सैन्यात चकमकी झडत असल्याने काही जवानांसह ३३ जण ठार झाले असून शेकडो लोक जखमी झाले. या संघर्षामुळे सीमाभागातील हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. एक हजार वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिरावरून दोन्ही देशात युद्ध भडकल्याचा दावा करण्यात येत आहे. 

या संघर्षात कंबोडियातील १३ जणांचा मृत्यू झाला असून किमान ७१ नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये पाच जवानांचा तर ८ नागरिकांचा समावेश आहे. या संघर्षात थायलंडच्या २० लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ६ जवान व १४ नागरिकांचा समावेश आहे. थायलंडने मुद्दामहून हल्ले सुरू केले आहेत. थायलंडचे सैन्य त्यांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप कंबोडिया सरकारने केला आहे. युद्धामुळे सीमा भागातील चार प्रांत प्रभावीत झाल्याने अनेक गावांमधील किमान १ लाख  ६८ हजार लोक विस्थापित झाले आहेत. विस्थापित नागरिकांना तात्पुरत्या शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागल्याचा दावा थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. कंबोडियाने सीमा भागातील २३ हजार नागरिकांनी या संघर्षामुळे पलायन केले आहे. दोन्ही देशांनी आपल्या राजदूतांना परत बोलावले आहे. 

दोन्ही देशांनी केला दावा 

थायलंड व कंबोडियाच्या सीमेलगतच्या ता. मुएन थोम या पुरातन मंदिरावरून दोन्ही देशात वाद सुरू आहे. दोन्ही देशांकडून मंदिरावर दावा केला जातो. शुक्रवारी पहाटे सीमा भागात दोन्ही देशांच्या सैन्यात चकमकी उडाल्या.

संयुक्त राष्ट्राकडून शांततेचे आवाहन 

संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने थायलंड व कंबोडियाला शांततेचे आवाहन केले आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री न्यूयॉर्क येथे सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक झाली. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स या दहा देशांच्या प्रादेशिक गटाचे अध्यक्षपद मलेशियाकडे आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी शत्रुत्व संपवण्याचे आवाहन मलेशियाने केले आहे.  

भारतीयांना सतर्कतेचा इशारा 

युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कंबोडिया-थायलंड सीमाभागातील आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सीमा भागातील प्रवास टाळण्याचा सल्ला भारतीय दूतावासाने दिला. तसेच आपात्कालिन परिस्थितीत संपर्क करण्याचे आवाहनही दूतावासाने केले आहे.

 

टॅग्स :Thailandथायलंडwarयुद्ध