शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 06:20 IST

राजदूत बोलावले परत; युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचा कंबोडिया-थायलंड सीमाभागातील आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

सुरिन : थायलंड व कंबोडियातील संघर्षाने उग्ररूप धारण केल्याने सीमा भागाचे युद्धभूमीत रूपांतर झाले आहे. तीन दिवसांपासून दोन्ही देशाच्या सैन्यात चकमकी झडत असल्याने काही जवानांसह ३३ जण ठार झाले असून शेकडो लोक जखमी झाले. या संघर्षामुळे सीमाभागातील हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. एक हजार वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिरावरून दोन्ही देशात युद्ध भडकल्याचा दावा करण्यात येत आहे. 

या संघर्षात कंबोडियातील १३ जणांचा मृत्यू झाला असून किमान ७१ नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये पाच जवानांचा तर ८ नागरिकांचा समावेश आहे. या संघर्षात थायलंडच्या २० लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ६ जवान व १४ नागरिकांचा समावेश आहे. थायलंडने मुद्दामहून हल्ले सुरू केले आहेत. थायलंडचे सैन्य त्यांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप कंबोडिया सरकारने केला आहे. युद्धामुळे सीमा भागातील चार प्रांत प्रभावीत झाल्याने अनेक गावांमधील किमान १ लाख  ६८ हजार लोक विस्थापित झाले आहेत. विस्थापित नागरिकांना तात्पुरत्या शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागल्याचा दावा थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. कंबोडियाने सीमा भागातील २३ हजार नागरिकांनी या संघर्षामुळे पलायन केले आहे. दोन्ही देशांनी आपल्या राजदूतांना परत बोलावले आहे. 

दोन्ही देशांनी केला दावा 

थायलंड व कंबोडियाच्या सीमेलगतच्या ता. मुएन थोम या पुरातन मंदिरावरून दोन्ही देशात वाद सुरू आहे. दोन्ही देशांकडून मंदिरावर दावा केला जातो. शुक्रवारी पहाटे सीमा भागात दोन्ही देशांच्या सैन्यात चकमकी उडाल्या.

संयुक्त राष्ट्राकडून शांततेचे आवाहन 

संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने थायलंड व कंबोडियाला शांततेचे आवाहन केले आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री न्यूयॉर्क येथे सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक झाली. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स या दहा देशांच्या प्रादेशिक गटाचे अध्यक्षपद मलेशियाकडे आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी शत्रुत्व संपवण्याचे आवाहन मलेशियाने केले आहे.  

भारतीयांना सतर्कतेचा इशारा 

युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कंबोडिया-थायलंड सीमाभागातील आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सीमा भागातील प्रवास टाळण्याचा सल्ला भारतीय दूतावासाने दिला. तसेच आपात्कालिन परिस्थितीत संपर्क करण्याचे आवाहनही दूतावासाने केले आहे.

 

टॅग्स :Thailandथायलंडwarयुद्ध