शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

माऊंट एव्हरेस्टवरून उचलला तब्बल 3000 किलो कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 09:55 IST

नेपाळने 14 एप्रिलपासून सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सफाई मोहिमेंतर्गत माऊंट एव्हरेस्टवरून आत्तापर्यंत सुमारे तीन हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे.

ठळक मुद्देनेपाळने 14 एप्रिलपासून सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सफाई मोहिमेंतर्गत माऊंट एव्हरेस्टवरून आत्तापर्यंत सुमारे तीन हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे.5 दिवसांच्या या मोहिमेंतर्गत एव्हरेस्टवरून सुमारे 10 हजार किलो कचरा उचलण्याचे लक्ष्य आहे. सोलुखुंबु जिल्ह्यातील खुंबू पासनगलामू ग्रामीण पालिकेने 14 एप्रिलला ही मोहीम सुरू केली होती.

काठमांडू - नेपाळने 14 एप्रिलपासून सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सफाई मोहिमेंतर्गत माऊंट एव्हरेस्टवरून आत्तापर्यंत सुमारे तीन हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे. माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर मानले जाते. 45 दिवसांच्या या मोहिमेंतर्गत एव्हरेस्टवरून सुमारे 10 हजार किलो कचरा उचलण्याचे लक्ष्य आहे. 

सोलुखुंबु जिल्ह्यातील खुंबू पासनगलामू ग्रामीण पालिकेने 14 एप्रिलला ही मोहीम सुरू केली होती. 45 दिवस राबवली जाणारी एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम ही नेपाळी नववर्ष सुरू झालं त्यादिवसापासून सुरू झाली. या मोहिमेंतर्गत 10 हजार किलो कचरा एव्हरेस्टवरून गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पर्यटन महासंचालक दांडू राज घिमिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तीन हजार किलो कचरा गोळा करण्यात आला असून त्यातील दोन हजार किलो कचरा ओखालधुंगा येथे, तर 1000 किलो कचरा काठमांडूला पाठवण्यात आला आहे. तीन हजार किलो कचरा उचलण्यात आला असून त्यामध्ये प्लास्टीक, बिअर बॉटल्स, कॉस्मेटीक कव्हरचा समावेश आहे. कचरा पाठवण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला आहे. 

बेस कॅम्पवरून पाच हजार किलो तसेच दक्षिण भागातून दोन हजार किलो तर कॅम्प 2 व 3 भागातून तीन हजार किलो कचरा गोळा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. माऊंट एव्हरेस्टवर पडलेले मृतदेहही परत आणण्याचा समावेश या एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत आहे. या मोहिमेत सर्व लोक सहभागी आहेत. बेसकॅम्पच्या ठिकाणी चार मृतदेह सापडले असून ते खाली आणण्यात आले आहेत. एव्हरेस्ट स्वच्छता मोहिमेत 23 दशलक्ष नेपाळी रुपये खर्च होणार आहेत. या मोसमात 500 परदेशी गिर्यारोहक व 1000 सहायक मोहिमात सहभागी होणार आहेत. गिर्यारोहकांनी त्यांचा कचरा परत आणला तर ते जास्त फायदेशीर ठरेल असे सांगण्यात आले आहे. एडंमड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी 29 मे 1953 रोजी पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केले होते. त्यामुळे ही एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम त्यादिवशी संपणार आहे. माऊंट एव्हरेस्टची स्वच्छता करण्यासाठी सरकारने याआधीही प्रयत्न केले आहेत. 

 

टॅग्स :Everestएव्हरेस्टGarbage Disposal Issueकचरा प्रश्न