शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 13:07 IST

 १९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे.

ढाका - पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवू मात्र आम्ही १९७१ विसरू शकत नाही असं स्पष्ट मत बांगलादेशातील अंतरिम सरकारने व्यक्त केले आहे. पाकिस्तानसोबतचे मतभेद दूर केले जाऊ शकतात परंतु त्यासाठी इस्लामाबादला १९७१ वर बोलण्याचं धाडस करायला हवं, माफी मागायली हवी असं बांगलादेश सरकारमधील परराष्ट्र विभागाचे सल्लागार मोहम्मद तौहीन हुसैन यांनी मंगळवारी म्हटलं.

ढाका येथील पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाला इस्लामाबादशी निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर हुसैन म्हणाले की, बांगलादेश निश्चितच पाकिस्तानसोबत चांगले संबंध बनवू इच्छितो परंतु १९७१ आम्ही विसरलोय हा संदेश जायला नको. १९७१ मध्ये जे काही घडले ते आम्ही विसरू शकत नाही. दोन्ही देशातील संबंध सुधारतील जर पाकिस्तानने १९७१ मध्ये जे काही झाले त्याचा उल्लेख करण्याचं धाडस करेल आणि घडलेल्या घटनांवर माफी मागेल असं त्यांनी स्पष्ट सांगितले.

तसेच बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी २५ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत बैठक घेतली. ही बैठक शिष्टाचाराचा भाग होती त्याचा अर्थ १९७१ मध्ये जे घडले ते सर्वकाही विसरले असा होत नाही असंही स्पष्टीकरण परराष्ट्र खात्याचे सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी दिले.

पाकिस्तानसमोर ठेवणार परखड प्रश्न

शिष्टाचार बैठकीव्यतिरिक्त जेव्हा पाकिस्तानसोबत आम्ही चर्चेला बसू तेव्हा त्यांना परखड प्रश्न विचारू. बांगलादेश १९७१ बाबत सर्वकाही विसरून पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवू इच्छिते अशाप्रकारे कुठलाही संदेश बाहेर जाऊ नये. १९७१ मध्ये जे घडले ते आमच्या मनात कायम राहणार आहे. १९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे. या परिस्थितीबाबत आमच्या सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असं मोहम्मद तौहीद यांनी म्हटलं. १९७० आणि १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कराने वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या बंगाली लोकांवर प्रचंड अत्याचार केले होते. पाक लष्कराने बांगलादेशातील आंदोलन चिरडण्याचा निर्दयीपणे प्रयत्न केला होता. यामुळे  बांगलादेशात पाकिस्तानबद्दल खूप चीड आहे. जी आजही दिसून येते.

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान