शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 13:07 IST

 १९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे.

ढाका - पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवू मात्र आम्ही १९७१ विसरू शकत नाही असं स्पष्ट मत बांगलादेशातील अंतरिम सरकारने व्यक्त केले आहे. पाकिस्तानसोबतचे मतभेद दूर केले जाऊ शकतात परंतु त्यासाठी इस्लामाबादला १९७१ वर बोलण्याचं धाडस करायला हवं, माफी मागायली हवी असं बांगलादेश सरकारमधील परराष्ट्र विभागाचे सल्लागार मोहम्मद तौहीन हुसैन यांनी मंगळवारी म्हटलं.

ढाका येथील पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाला इस्लामाबादशी निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर हुसैन म्हणाले की, बांगलादेश निश्चितच पाकिस्तानसोबत चांगले संबंध बनवू इच्छितो परंतु १९७१ आम्ही विसरलोय हा संदेश जायला नको. १९७१ मध्ये जे काही घडले ते आम्ही विसरू शकत नाही. दोन्ही देशातील संबंध सुधारतील जर पाकिस्तानने १९७१ मध्ये जे काही झाले त्याचा उल्लेख करण्याचं धाडस करेल आणि घडलेल्या घटनांवर माफी मागेल असं त्यांनी स्पष्ट सांगितले.

तसेच बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी २५ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत बैठक घेतली. ही बैठक शिष्टाचाराचा भाग होती त्याचा अर्थ १९७१ मध्ये जे घडले ते सर्वकाही विसरले असा होत नाही असंही स्पष्टीकरण परराष्ट्र खात्याचे सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी दिले.

पाकिस्तानसमोर ठेवणार परखड प्रश्न

शिष्टाचार बैठकीव्यतिरिक्त जेव्हा पाकिस्तानसोबत आम्ही चर्चेला बसू तेव्हा त्यांना परखड प्रश्न विचारू. बांगलादेश १९७१ बाबत सर्वकाही विसरून पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवू इच्छिते अशाप्रकारे कुठलाही संदेश बाहेर जाऊ नये. १९७१ मध्ये जे घडले ते आमच्या मनात कायम राहणार आहे. १९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे. या परिस्थितीबाबत आमच्या सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असं मोहम्मद तौहीद यांनी म्हटलं. १९७० आणि १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कराने वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या बंगाली लोकांवर प्रचंड अत्याचार केले होते. पाक लष्कराने बांगलादेशातील आंदोलन चिरडण्याचा निर्दयीपणे प्रयत्न केला होता. यामुळे  बांगलादेशात पाकिस्तानबद्दल खूप चीड आहे. जी आजही दिसून येते.

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान