शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 13:07 IST

 १९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे.

ढाका - पाकिस्तानसोबत चांगले संबंध ठेवू मात्र आम्ही १९७१ विसरू शकत नाही असं स्पष्ट मत बांगलादेशातील अंतरिम सरकारने व्यक्त केले आहे. पाकिस्तानसोबतचे मतभेद दूर केले जाऊ शकतात परंतु त्यासाठी इस्लामाबादला १९७१ वर बोलण्याचं धाडस करायला हवं, माफी मागायली हवी असं बांगलादेश सरकारमधील परराष्ट्र विभागाचे सल्लागार मोहम्मद तौहीन हुसैन यांनी मंगळवारी म्हटलं.

ढाका येथील पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाला इस्लामाबादशी निगडीत एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर हुसैन म्हणाले की, बांगलादेश निश्चितच पाकिस्तानसोबत चांगले संबंध बनवू इच्छितो परंतु १९७१ आम्ही विसरलोय हा संदेश जायला नको. १९७१ मध्ये जे काही घडले ते आम्ही विसरू शकत नाही. दोन्ही देशातील संबंध सुधारतील जर पाकिस्तानने १९७१ मध्ये जे काही झाले त्याचा उल्लेख करण्याचं धाडस करेल आणि घडलेल्या घटनांवर माफी मागेल असं त्यांनी स्पष्ट सांगितले.

तसेच बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी २५ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत बैठक घेतली. ही बैठक शिष्टाचाराचा भाग होती त्याचा अर्थ १९७१ मध्ये जे घडले ते सर्वकाही विसरले असा होत नाही असंही स्पष्टीकरण परराष्ट्र खात्याचे सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी दिले.

पाकिस्तानसमोर ठेवणार परखड प्रश्न

शिष्टाचार बैठकीव्यतिरिक्त जेव्हा पाकिस्तानसोबत आम्ही चर्चेला बसू तेव्हा त्यांना परखड प्रश्न विचारू. बांगलादेश १९७१ बाबत सर्वकाही विसरून पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवू इच्छिते अशाप्रकारे कुठलाही संदेश बाहेर जाऊ नये. १९७१ मध्ये जे घडले ते आमच्या मनात कायम राहणार आहे. १९७१ च्या युद्धात नि:शस्त्र बंगाली भाषिक लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पाकिस्तानने औपचारिकपणे माफी मागावी अशी बांगलादेशची अधिकृत भूमिका नेहमीच राहिली आहे. या परिस्थितीबाबत आमच्या सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असं मोहम्मद तौहीद यांनी म्हटलं. १९७० आणि १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कराने वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या बंगाली लोकांवर प्रचंड अत्याचार केले होते. पाक लष्कराने बांगलादेशातील आंदोलन चिरडण्याचा निर्दयीपणे प्रयत्न केला होता. यामुळे  बांगलादेशात पाकिस्तानबद्दल खूप चीड आहे. जी आजही दिसून येते.

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तान