शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा 'हट्टीपणा' नडला! १४ वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेला; नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 08:16 IST

लहान मुलाच्या मृत्यूनंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

Maldives Medical Emergency , India Airlift , Boy Died: भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण  आहेत. मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले होते. तेव्हापासून तणावात सातत्याने वाढ होत आहे. तशातच आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या एका 'हट्टीपणा'मुळे एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला असल्याचे म्हटले जात आहे. अवघ्या १४ वर्षाच्या मुलाला वैद्यकीय आणीबाणीसाठी (Medical Emergency) भारतीय हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्याची गरज होती. त्यासाठी मालदीव सरकारने परवानगी दिली नाही. परिणामी उपचारास उशीर झाल्याने बालकाचा मृत्यू झाला.

भारताने यापूर्वी दोन नौदल हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान मालदीवला वैद्यकीय निर्वासन आणि इतर उच्च उपलब्धता आपत्ती पुनर्प्राप्ती (HARD) क्रियाकलापांसाठी प्रदान केले आहे. मालदीवच्या मीडियानुसार, मुलाला ब्रेन ट्यूमर होता आणि त्याला अचानक स्ट्रोक आला. त्यांची प्रकृती गंभीर होती. कुटुंबाने त्याला गॅफ अलिफ विलिंगिली येथील त्याच्या घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली होती. तात्काळ मेडिकल एअरलिफ्टची व्यवस्था करण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

एअर अॅम्ब्युलन्सकडून प्रतिसाद नाही

मालदीवच्या मीडियानुसार, मृत मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की त्यांनी स्ट्रोकनंतर लगेचच त्याला माले येथे नेण्यासाठी आयलँड एव्हिएशनला कॉल केला, परंतु त्यांनी आमच्या कॉलला उत्तर दिले नाही. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी फोनला उत्तर दिले. अशा प्रकरणांवर एअर अॅम्ब्युलन्स हा एकमेव उपाय आहे. तात्काळ एअरलिफ्टची विनंती केल्यानंतर १६ तासांनी मुलाला माले येथे आणण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भारतीय हेलिकॉप्टर न वापरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची चर्चा होत असून मुइज्जू यांच्या धोरणावर टीका केली जात आहे.

मालदीव सरकारने भारतीय सैनिकांना परत पाठवण्याचा आग्रह धरल्याने भारतीय हेलिकॉप्टर आणि विमानांचे भवितव्य अधांतरी आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला १५ मार्चपर्यंत आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. मात्र, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अजूनही चर्चा सुरू असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

तशातच वैद्यकीय आणीबाणी दरम्यानही भारतीय हेलिकॉप्टर न वापरल्याने मालदीवमध्ये टीका होत आहे. मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घस्सान यांनी सांगितले की, मालदीव एअरलाइन्सकडून अजूनही ९३ टक्के लोकांचे स्थलांतर सुरू आहे. घस्सान यांनी सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की वैद्यकीय ऑपरेशन्सच्या एसओपी (मानक ऑपरेटिंग प्रक्रिया) ला अधिसूचित करण्याची किंवा राष्ट्रपतींकडून परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. हे संबंधित संस्थांच्या समन्वयातून केले जाते. मालदीवचे खासदार मिकाईल अहमद नसीम म्हणाले की, राष्ट्रपतींच्या भारताप्रती असलेल्या द्वेषामुळे लोकांना आपल्या जीवाची किंमत चुकवायला लागू नये. तसे झाल्यास हे दुर्दैवी ठरेल.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतMedicalवैद्यकीयNarendra Modiनरेंद्र मोदी