शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा 'हट्टीपणा' नडला! १४ वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेला; नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 08:16 IST

लहान मुलाच्या मृत्यूनंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

Maldives Medical Emergency , India Airlift , Boy Died: भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण  आहेत. मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले होते. तेव्हापासून तणावात सातत्याने वाढ होत आहे. तशातच आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या एका 'हट्टीपणा'मुळे एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला असल्याचे म्हटले जात आहे. अवघ्या १४ वर्षाच्या मुलाला वैद्यकीय आणीबाणीसाठी (Medical Emergency) भारतीय हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्याची गरज होती. त्यासाठी मालदीव सरकारने परवानगी दिली नाही. परिणामी उपचारास उशीर झाल्याने बालकाचा मृत्यू झाला.

भारताने यापूर्वी दोन नौदल हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान मालदीवला वैद्यकीय निर्वासन आणि इतर उच्च उपलब्धता आपत्ती पुनर्प्राप्ती (HARD) क्रियाकलापांसाठी प्रदान केले आहे. मालदीवच्या मीडियानुसार, मुलाला ब्रेन ट्यूमर होता आणि त्याला अचानक स्ट्रोक आला. त्यांची प्रकृती गंभीर होती. कुटुंबाने त्याला गॅफ अलिफ विलिंगिली येथील त्याच्या घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली होती. तात्काळ मेडिकल एअरलिफ्टची व्यवस्था करण्यात अधिकारी अपयशी ठरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

एअर अॅम्ब्युलन्सकडून प्रतिसाद नाही

मालदीवच्या मीडियानुसार, मृत मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे की त्यांनी स्ट्रोकनंतर लगेचच त्याला माले येथे नेण्यासाठी आयलँड एव्हिएशनला कॉल केला, परंतु त्यांनी आमच्या कॉलला उत्तर दिले नाही. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी फोनला उत्तर दिले. अशा प्रकरणांवर एअर अॅम्ब्युलन्स हा एकमेव उपाय आहे. तात्काळ एअरलिफ्टची विनंती केल्यानंतर १६ तासांनी मुलाला माले येथे आणण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भारतीय हेलिकॉप्टर न वापरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची चर्चा होत असून मुइज्जू यांच्या धोरणावर टीका केली जात आहे.

मालदीव सरकारने भारतीय सैनिकांना परत पाठवण्याचा आग्रह धरल्याने भारतीय हेलिकॉप्टर आणि विमानांचे भवितव्य अधांतरी आहे. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला १५ मार्चपर्यंत आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. मात्र, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अजूनही चर्चा सुरू असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

तशातच वैद्यकीय आणीबाणी दरम्यानही भारतीय हेलिकॉप्टर न वापरल्याने मालदीवमध्ये टीका होत आहे. मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घस्सान यांनी सांगितले की, मालदीव एअरलाइन्सकडून अजूनही ९३ टक्के लोकांचे स्थलांतर सुरू आहे. घस्सान यांनी सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की वैद्यकीय ऑपरेशन्सच्या एसओपी (मानक ऑपरेटिंग प्रक्रिया) ला अधिसूचित करण्याची किंवा राष्ट्रपतींकडून परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. हे संबंधित संस्थांच्या समन्वयातून केले जाते. मालदीवचे खासदार मिकाईल अहमद नसीम म्हणाले की, राष्ट्रपतींच्या भारताप्रती असलेल्या द्वेषामुळे लोकांना आपल्या जीवाची किंमत चुकवायला लागू नये. तसे झाल्यास हे दुर्दैवी ठरेल.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतMedicalवैद्यकीयNarendra Modiनरेंद्र मोदी