शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

११ शहरांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा धोका, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंगळुरू शहरही काठावर उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:10 IST

जगभरातील महत्त्वाच्या ११ शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात भारतातील बंगळुरूचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

केप टाऊन : जगभरातील महत्त्वाच्या ११ शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात भारतातील बंगळुरूचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.पृथ्वीचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असला तरी त्यापैकी ३ टक्केच पाणी पिण्याच्या योग्यतेचे आहे. जगभरातील १ अब्ज लोकांना पिण्याचे पाणी मिळविण्यास खूपच कष्ट करावे लागतात, तर २.७ अब्ज लोकांना वर्षातील किमान एक महिना पिण्याचे पाणी मिळविणे जवळपास अश्क्य होते. जगातील ५०० मोठ्या शहरांमधील दर चारपैकी एका शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते, असा निष्कर्ष या संदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.दुष्काळाचा जोरदार तडाखा बसलेल्या केपटाउनमध्ये सध्या जसे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले आहे, तशी स्थिती बंगळुरूसह ११ शहरांमध्ये भविष्यात निर्माण होऊ शकते. भारत व चीनमधील शहरांतील वाढती लोकसंख्या व तिला मिळणारे पिण्याचे पाणी यांचे प्रमाण व्यस्त आहे. बंगळुरू शहरातील सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्थाही येत्या काही वर्षांमध्ये तोकडी पडण्याची चिन्हे आहेत. पाण्याच्या पाइपलाइन अत्यंत जुनाट झालेल्या असून, त्या बदलणे आवश्यक आहे. पाण्याच्या गळतीमुळे व गैरवापरामुळे बंगळुरू शहरातील अर्धे पाणी हे सांडपाण्याबरोबर वाहून जाते. बंगळुरू शहरातील एकाही तलावाचे पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचा उपयोग केवळ औद्योगिक प्रकल्पांसाठी तसेच जलसंधारणासाठी होतो.जगातील ज्या अन्य शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते, त्यामध्ये बिजिंग, कैरो, जकार्ता, मॉस्को, इस्तंबूल, मेक्सिको, लंडन, साओ पावलो, जकार्ता यांचा समावेश असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.बंगळुरूमध्ये दमछाकबंगळुरू शहरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी आपले जाळे विस्तारले. त्यानंतर देशभरातून तिथे काही लाख लोक राहावयास आले. शहराची संख्या वाढली. तसे बांधकामांनाही वेग आला. शहराचा विकास होऊ लागला. मात्र वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतक्या पिण्याच्या पाण्याची सोय करताना बंगळुरु शहराच्या पालिकेची व शासनाची दमछाक होत आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयWaterपाणी