शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

हायजॅक रेल्वेत १०० सैनिकांना मारले, सरकारने पाठविल्या २०० शवपेट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:14 IST

सर्व अतिरेकी ठार झाल्याचा दावा; प्रवासी म्हणतात... हा भयंकर प्रसंग जन्मभर विसरणार नाही

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सैनिक आणि बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए) आर्मी यांच्यात ४४ तासांपासून चकमक सुरू होती.  बीएलएने मंगळवारी ४० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्यानंतर बुधवारी ६० पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

अजूनही १५० ओलिस आमच्या कैदेत असल्याचा दावा बीएलएने केला असून, पाकिस्तान सरकारने येत्या २० तासांत बलुच कैद्यांची सुटका केली नाही, तर या सर्व लोकांनाही मारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याआधी बुधवारी दुपारी, पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानच्या क्वेटा येथे २०० शवपेटी पाठवल्या होत्या. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

या भ्याड कृत्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे आणि निष्पाप जीव गमावल्याने दुःख झाले आहे. सर्व डझनभर दहशतवाद्यांना नरकात पाठवण्यात आले आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

हायजॅक केल्याचा व्हिडीओ

रेल्वे हायजॅक केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बीएलए नावाने हा जारी केला असला तरी बीएलएने त्याची पुष्टी केलेली नाही. या व्हिडीओत रेल्वेमध्ये स्फोट होताना दिसत आहे. इंजिनमधून मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट निघताना दिसत आहेत, तसेच व्हिडीओच्या पुढील भागात प्रवाशांना बंधक बनवल्याचे दिसो.

तुर्बत आहे म्हणताच सोडून दिले

प्रत्यक्षदर्शी इशाकने सांगितले की, आमच्या डब्यातील किमान ११ प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. ते सर्व सुरक्षा कर्मचारी होते. या कालावधीत एकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

त्यानंतर डब्यातील सर्व लोकांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. ते मलाही घेऊन जात होते. परंतु मी सांगितले की, मी बलुचिस्तानचा रहिवासी आहे. माझ्याबरोबर महिला व मुले आहेत. त्यानंतर त्यांनी मला सोडले.

हल्लेखोरांची संख्या १,१००?

प्रवासी अशरफ याने सांगितले की, अतिरेक्यांनी वृद्ध, नागरिक, महिला व बालकांना जाऊ दिले. प्रवासी घाबरलेले होते. अंदाजानुसार ते २५० लोकांना बरोबर गेऊन गेले. हल्लेखोरांची संख्या १,१०० होती.

डोळ्यासमोरून जन्मभर ही घटना जाणार नाही

हा भयंकर प्रसंग मी जन्मभर विसरणार नाही, अशा शब्दांत पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अतिरेक्यांनी रेल्वे हायजॅक केल्याच्या घटनेतील प्रत्यक्षदर्शी प्रवासी मुश्ताक मोहम्मद यांनी आपबीती सांगितली आहे. बलूच अतिरेक्यांनी हायजॅक केलेल्या रेल्वेमधून ते प्रवास करीत होते. हल्ल्याच्या सुरुवातीस भीषण स्फोट झाला. त्यानंतर गोळीबार एक तास सुरू होता. तो असा प्रसंग होता की, जन्मभर डोळ्यासमोरून जाणार नाही, असे मुश्ताक म्हणाले.

गोळीबारानंतर सशस्त्र लोक रेल्वेच्या डब्यात घुसले. काही लोकांची त्यांनी ओळखपत्रे पाहिली व काही जणांना वेगळे केले. तीन अतिरेकी आमच्या डब्याच्या दाराजवळ पहारा देत होते. आम्ही सर्वसामान्य नागरिक, महिला, वृद्ध व बलूच लोकांना काहीही करणार नाहीत. ते बलुची भाषेत बोलत होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवा, त्यांना शस्त्रे काढू देऊ नका, असे त्यांचा म्होरक्या त्यांना वारंवार म्हणत होता, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान