शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

हायजॅक रेल्वेत १०० सैनिकांना मारले, सरकारने पाठविल्या २०० शवपेट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:14 IST

सर्व अतिरेकी ठार झाल्याचा दावा; प्रवासी म्हणतात... हा भयंकर प्रसंग जन्मभर विसरणार नाही

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सैनिक आणि बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए) आर्मी यांच्यात ४४ तासांपासून चकमक सुरू होती.  बीएलएने मंगळवारी ४० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्यानंतर बुधवारी ६० पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

अजूनही १५० ओलिस आमच्या कैदेत असल्याचा दावा बीएलएने केला असून, पाकिस्तान सरकारने येत्या २० तासांत बलुच कैद्यांची सुटका केली नाही, तर या सर्व लोकांनाही मारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याआधी बुधवारी दुपारी, पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानच्या क्वेटा येथे २०० शवपेटी पाठवल्या होत्या. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

या भ्याड कृत्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे आणि निष्पाप जीव गमावल्याने दुःख झाले आहे. सर्व डझनभर दहशतवाद्यांना नरकात पाठवण्यात आले आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

हायजॅक केल्याचा व्हिडीओ

रेल्वे हायजॅक केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बीएलए नावाने हा जारी केला असला तरी बीएलएने त्याची पुष्टी केलेली नाही. या व्हिडीओत रेल्वेमध्ये स्फोट होताना दिसत आहे. इंजिनमधून मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट निघताना दिसत आहेत, तसेच व्हिडीओच्या पुढील भागात प्रवाशांना बंधक बनवल्याचे दिसो.

तुर्बत आहे म्हणताच सोडून दिले

प्रत्यक्षदर्शी इशाकने सांगितले की, आमच्या डब्यातील किमान ११ प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. ते सर्व सुरक्षा कर्मचारी होते. या कालावधीत एकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

त्यानंतर डब्यातील सर्व लोकांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. ते मलाही घेऊन जात होते. परंतु मी सांगितले की, मी बलुचिस्तानचा रहिवासी आहे. माझ्याबरोबर महिला व मुले आहेत. त्यानंतर त्यांनी मला सोडले.

हल्लेखोरांची संख्या १,१००?

प्रवासी अशरफ याने सांगितले की, अतिरेक्यांनी वृद्ध, नागरिक, महिला व बालकांना जाऊ दिले. प्रवासी घाबरलेले होते. अंदाजानुसार ते २५० लोकांना बरोबर गेऊन गेले. हल्लेखोरांची संख्या १,१०० होती.

डोळ्यासमोरून जन्मभर ही घटना जाणार नाही

हा भयंकर प्रसंग मी जन्मभर विसरणार नाही, अशा शब्दांत पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अतिरेक्यांनी रेल्वे हायजॅक केल्याच्या घटनेतील प्रत्यक्षदर्शी प्रवासी मुश्ताक मोहम्मद यांनी आपबीती सांगितली आहे. बलूच अतिरेक्यांनी हायजॅक केलेल्या रेल्वेमधून ते प्रवास करीत होते. हल्ल्याच्या सुरुवातीस भीषण स्फोट झाला. त्यानंतर गोळीबार एक तास सुरू होता. तो असा प्रसंग होता की, जन्मभर डोळ्यासमोरून जाणार नाही, असे मुश्ताक म्हणाले.

गोळीबारानंतर सशस्त्र लोक रेल्वेच्या डब्यात घुसले. काही लोकांची त्यांनी ओळखपत्रे पाहिली व काही जणांना वेगळे केले. तीन अतिरेकी आमच्या डब्याच्या दाराजवळ पहारा देत होते. आम्ही सर्वसामान्य नागरिक, महिला, वृद्ध व बलूच लोकांना काहीही करणार नाहीत. ते बलुची भाषेत बोलत होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवा, त्यांना शस्त्रे काढू देऊ नका, असे त्यांचा म्होरक्या त्यांना वारंवार म्हणत होता, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान