शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कधीकाळी २०० रुपये मजुरीसाठी वणवण भटकायचे अन् आता लखपती झाले शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 11:42 IST

पावसाळी वातावरणात अनेक गावकरी शेती करायचे परंतु त्यातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागत नव्हता.

हजारीबाग - झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील चर्चू आणि धारी भागातील अनेक शेतकऱ्यांचे नशीब आता बदलत आहे. या दोन्ही परिसरातील विविध गावात बहुतांश लोक २०१५ च्या आधी मजुरीच्या शोधात वणवण फिरत होते. त्यात अनिल हेम्ब्रम आणि महिमा मुर्मू यांचाही सहभाग होता. उत्पन्नाचे कुठलेही साधन नव्हते त्यामुळे कामाच्या शोधात गाव-शहरात मजुरीवर निर्भर राहावे लागायचे. हलाखीच्या परिस्थिती गावकऱ्यांना २ वेळचे जेवण मिळायचे. 

पावसाळी वातावरणात अनेक गावकरी शेती करायचे परंतु त्यातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागत नव्हता. त्यामुळे गावकऱ्यांपैकी अनेकांनी शहराकडे स्थलांतर केले होते. मात्र आता या गावांचे चित्र बदलले आहे. चर्चूच्या महिमा मुर्म सांगतात की, सुरुवातीला शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. परंतु ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाने आता हा त्रास दूर झाला आहे. पाणीही कमी प्रमाणात लागते. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत शेती करणाऱ्यांचे उत्पन्न ७० हजार ते १ लाखापर्यंत होत आहे. याआधी घर कुटुंब चालवण्यासाठी मजुरीवर निर्भर राहावं लागायचे. 

ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाने वर्षभर शेती करणे शक्यग्रीनहाऊस तंत्रज्ञानाने शेती केल्याने नशीब बदलले. पूर्वीची शेती फक्त पावसाळ्यातच शक्य होती. मात्र आता प्रत्येक हंगामात शेती करणे शक्य झाले आहे. ग्रीन हाऊस तंत्रज्ञानाने शेती केल्याने प्राण्यांपासून संरक्षणही शक्य होते. पूर्वी जनावरांमुळे पिकांचे खूप नुकसान होत असे. या शेतकऱ्यांकडून दरवर्षी टोमॅटो, मिरजेसह अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांची लागवड केली जात आहे असं धारी भागातील अनिल हेम्ब्रमने सांगितले. 

हैदराबादस्थित संस्था 'शेती' आणि सिनी टाटा ट्रस्टच्या मदतीने चर्चू, धारी परिसरातील शेतकऱ्यांना 'लखपती' बनवण्याची योजना सुरू करण्यात आली. सिनी टाटा ट्रस्टचे अभिजीत जाना म्हणाले की, २०१५ मध्ये लहान शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी संस्थेने विशेष पुढाकार घेतला होता. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत असत, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते आणि नफाही फारसा मिळत नव्हता. हे लक्षात घेऊन हैदराबादच्या 'शेती' या संस्थेने छोट्या शेतकऱ्यांना ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाची सुविधा व मदत उपलब्ध करून दिली. त्याच्या मदतीने आता दोन्ही भागातील डझनभर शेतकरी 'लखपती' शेतकरी श्रेणीत आले आहेत.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी