शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:53 IST

अनेकदा आपण मैत्रीच्या कहाणी ऐकतो, तशीच ही गोष्ट आहे ३ मित्रांची, ज्यांनी मेहनतीच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण केली आहेत. 

नवी दिल्ली - "ये दोस्ती हम नही तोडेंगे.." फिल्म शोले सिनेमातील हे प्रसिद्ध गाणं तुम्ही ऐकलं असेलच. मैत्रीच्या अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. आज आम्ही तुम्हाला अशा ३ मित्रांची गोष्ट सांगणार आहोत, जे तिघेही एकत्र शिकले, एकत्र अभ्यास केला आणि तिघेही आज प्रशासकीय सेवेत रुजू झालेत. या तिघांपैकी २ IAS तर १ जण IPS अधिकारी बनला आहे. 

ही कहाणी आहे आयपीएस साद मिया खान, आयएएस विशाल मिश्रा आणि गौरव विजयराम यांची. ३ वर्षापूर्वी २०१७ मध्ये या तिघांनी सर्वात कठीण असलेली यूपीएससीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत तिघेही चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. साद मिया खान उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी आहे. विशाल मिश्रासोबत त्यांची भेट हरकोटच्या टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटीत बीटेक करताना झाली. या दोघांनी एमटेकसाठी आयआयटी कानपूर येथे प्रवेश घेतला. तेव्हा सादने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 

एमटेकनंतर यूपीएससी तयारीसाठी साद खानसोबत विशाल मिश्राने दिल्ली गाठली. त्याठिकाणी या दोघांची भेट गौरव विजयराम यांच्याशी झाली. त्यानंतर हे तिघे जिगरी दोस्त बनले. त्यानंतर तिघांनी आपापली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. साद खाननं यूपीएससी परीक्षा २०१३ मध्ये दिली. मात्र पहिलं यश २०१७ मध्ये मिळालं. साद खान यांचा हा पाचवा प्रयत्न होता. साद यांनी ऑल इंडियामध्ये २५ वी रँक मिळवली परंतु आयएएसऐवजी आयपीएससाठी त्यांची निवड झाली. 

गौरव विजयराम यांनीही २०१७ मध्ये चौथ्यांदा यूपीएससी दिली, त्यांना देशात ३४ वा क्रमांक लागला. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, सुरुवातीच्या प्रयत्नात मी मुख्य परीक्षेसाठी तयारी केली नव्हती. त्यानंतरच्या प्रयत्नात जनरल स्टडीज पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळाले नव्हते असं त्यांनी सांगितले. तर आयएएस विशाल मिश्रा उत्तराखंडचे रहिवासी आहेत. आयआयटी कानपूर इथं प्रवेश घेतल्यानंतर साद खान यांच्यासोबत एमटेक केले. त्यानंतर यूपीएससी तयारी करणाऱ्या विशाल मिश्रा यांनाही २०१७ मध्ये यश मिळालं. ऑल इंडिया रँकिंगमध्ये त्यांचा ४९ वा क्रमांक होता. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी