शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

...तर १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के मुंबईकरांना दुसरा डोसही देऊ! : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:29 IST

मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लसीकरणासंदर्भात लिहिलं होतं पत्र.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांना मंगळवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या होत्या. तर दुसरीकडे सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानंदेखील आपल्याकडे लसींचा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, यासंदर्भात पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान, १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लसीचा दुसरा डोस देणं शक्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. "सध्या शाळा सुरू करण्याचीही गरज वाटते आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुलं घरी आहेत. माझी अनेकदा पालकांशी चर्चाही झाली आहे. आपल्याला १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लसीचा दुसरा डोस देणं शक्य असून यासाठी लसींच्या दोस डोसमधील कालावधी कमी करणं आवश्यक आहे," असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.  केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र वर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या फ्रंट लाईन आणि हेल्थकेअर वर्कर्सना त्यांच्या इच्छेनुसार तिसरा डोस घेण्याची परवानगी द्यावी, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. कोरोना लस घेण्यासाठी असलेली वयाची मर्यादा १५ वर्षांपर्यंत करावी. त्यामुळे माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लस मिळू शकेल, असं ठाकरेंनी पत्रात नमूद केलंय.

कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबद्दल विचार करण्याची विनंतीदेखील आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. 'दोन डोसमधील अंतर ४ आठवड्यांवर आणण्यात यावं. त्यामुळे मुंबईतील १०० टक्के नागरिकांचं लसीकरण जानेवारी २०२२ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल,' असं आदित्य यांना पत्रात नमूद केलं आहे. सध्या मुंबईत १०० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला असून दोन्ही डोस मिळालेल्या नागरिकांचं प्रमाण ७३ टक्के इतकं आहे, अशी आकडेवारीदेखील आदित्य ठाकरे यांनी पत्रात मांडली आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस