शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lokmat Infra Conclave: आधुनिक भारतासाठी महाराष्ट्राची वाटचाल महत्त्वाची - विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 10:07 IST

फक्त बातम्या देणे, टीकाटिप्पणी करणे एवढेच ‘लोकमत’चे काम नाही. तर, विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते करणे व चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे महत्त्वाचे आहे असं विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मुंबई : रस्ते एकमेकांसाठी जोडले जातात तेव्हा विकासाची दालने उघडली जातात. या विकासासाठी पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. देशाच्या १४ टक्के जीडीपीचा भार एकटा महाराष्ट्र उचलतो. त्यामुळेच महाराष्ट्राला आर्थिक पॉवर हाउस म्हटले जाते. आधुनिक भारतासाठी महाराष्ट्राची वाटचाल महत्त्वाची असल्याचे मत लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह २०२१ च्या प्रास्ताविकात दर्डा म्हणाले, फक्त बातम्या देणे, टीकाटिप्पणी करणे एवढेच ‘लोकमत’चे काम नाही. तर, विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते करणे व चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे महत्त्वाचे आहे. यासाठीच अशा उपक्रमांचे आयोजन लोकमत करत असते. पायाभूत विकासात महाराष्ट्राची वाटचाल महत्त्वाची आहे. समृद्धी महामार्ग, ट्रान्स हार्बर, मेट्रो, स्मार्ट सिटी, सिडकोचे नैना प्रोजेक्ट असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. कामात दर्जा व कालबद्ध पूर्तता महत्त्वाची आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने खर्च तर वाढतोच त्यासोबतच त्या त्या भागातील विकासाची संधी नाकारली जाते. त्यामुळे मोठे प्रकल्प आणताना त्याची आर्थिक व्यवहार्यता शेवटपर्यंत कायम राहील याचे भान राखणे महत्त्वाचे असल्याचे दर्डा म्हणाले.

नगररचना, शहरांचे नियोजन नीट न झाल्याने रस्ते, पाणी, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. झोपडपट्टी, पर्यावरणाचे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. या सर्व पार्श्वभूमीवर इन्फ्रा कॉन्क्लेव्ह महत्त्वाची आहे. मंत्री आणि प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी आजच्या कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थित आहेत. या राज्यातील नोकरशाही उत्तम आहे म्हणूनच राज्याचा विकास चांगला होत आहे.- विजय दर्डा

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा