शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

इम्रान खानच्या अडचणीत वाढत; फॉरेन फंडिंग प्रकरणात दोषी, पक्षावर लागू शकते कायमची बंदी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 16:18 IST

इम्रान खानवर भारतासह अनेक देशांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप आहे.

इस्लामाबाद:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाला 8 वर्षे जुन्या विदेशी निधी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) इम्रान यांना नोटीस बजावून त्यांची सर्व खाती का गोठवू नयेत, अशी विचारणा केली आहे.

या प्रकरणी इम्रान आणि पीटीआयने यापूर्वीही उत्तर दिले नव्हते. आयोगाच्या निर्णयानुसार- पीटीआयने इम्रानने आयोगाला खोटे प्रतिज्ञापत्र दिले होते. मूळात पक्षाने 34 परदेशी नागरिक आणि 351 कंपन्यांकडून देणग्या घेतल्या. तसेच, 13 खात्यांमध्ये सगळा काळा पैसा लपवला, पण फक्त 8 खात्यांची माहिती आयोगाला दिली. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत असून, सध्या 3 मोठ्या खात्यांची तपासणी केली जात आहेत.

इम्रान खान का अडकले?पाकिस्तानचे वृत्तपत्र 'द न्यूज'ने निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांचा हवाला देत म्हटले की- इम्रान खान आणि पीटीआयने अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यावसायिक महिला रोमिता शेट्टीकडून सुमारे 14,000 डॉलर्सची देणगी घेतली. इम्रान आणि पीटीआयवर भारतासह अनेक देशांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप होता आणि त्यांनी सरकार, निवडणूक आयोग किंवा वित्त मंत्रालयाला माहिती दिली नव्हती.

पक्षावर बंदी घातली जाणार?विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी इम्रान खान ज्या मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजाचे कौतुक करताना थकत नव्हते, आता त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करत आहेत. खान आणि त्यांच्या पक्षाची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे आता इम्रान आणि त्यांच्या पीटीआयवर आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. याशिवाय, पक्षावरही बंदी घालू शकतात. कारण, परदेशातून कोणतीही राजकीय देणगी घेणे पाकिस्तानमध्ये बेकायदेशीर आहे.

काय आहे परदेशी निधी प्रकरण?हे प्रकरण 2010 पासून सुरू झाले. त्यावेळी इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ मोठा होत होता. त्यावेळी पक्ष चालवायला पैसे नव्हते आणि मित्र मदत करायचे, असे खुद्द इम्रानने म्हटले आहे. 2014 मध्ये, पीटीआयच्या संस्थापक सदस्यांपैकी एक अकबर एस बाबर यांनी आरोप केला होता की, पीटीआयला इतर देशांमधून भरपूर काळा पैसा मिळत आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. पाकिस्तानच्या कायद्यानुसार कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीसाठी किंवा पक्ष चालवण्यासाठी इतर देशांकडून निधी घेऊ शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्यावर सुनावणी सुरू केली. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे इम्रानने सत्तेवर येताच या प्रकरणाची सुनावणी थांबवण्यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात 9 याचिका दाखल केल्या गेल्या. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान