शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारतीय हॉकी संघ नव्या पिढीसाठी विश्वचषक जिंकेल!; क्रीडामंत्री, माजी खेळाडूंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 06:15 IST

१९८० च्या ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू झफर इक्बाल म्हणाले, भारत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.

नवी दिल्ली : १९७५ व्या विश्वविजयाची पुनरावृत्ती करीत २०२३ ला मायदेशात भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून नव्या पिढीसाठी प्रेरणास्पद कामगिरी नक्की करेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि हॉकीतील माजी दिग्गजांनी शुक्रवारी व्यक्त केला. १३ ते २९ जानेवारी या कालावधीत भुवनेश्वर आणि राऊरकेला येथे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. 

विश्वचषकातील ट्रॉफीचे अनावरण केल्यानंतर  क्रीडामंत्री म्हणाले, ‘भारतीय संघ सज्ज असून अन्य १५ संघांचे आव्हान मोडीत काढण्याची आमच्या खेळाडूंची तयारी आहे. माझ्या मते, मायदेशात आमचा संघ विश्वविजेता नक्की बनू शकतो. भारतीय संघाची तयारी, खेळाडूंमधील नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहून मला विश्वास आहे की भारत विश्व चॅम्पियन बनेल.  आम्ही विश्वचषक आणि आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करू,’

भारताने ४७ वर्षांआधी १९७५ ला क्वालालम्पूर येथे विश्वचषक जिंकला होता. ठाकूर पुढे म्हणाले, ‘या प्रतिष्ठित ट्रॉफीचे अनावरण करताना मी आनंदी आहे.  ही स्पर्धा फारच शानदार होईल, असा विश्वास वाटतो.  आम्ही सर्वोत्कृष्ट असे आयोजन करू.  शानदार आयोजन आणि सर्वोत्तम खेळाच्या बळावर आमचा संघ चॅम्पियन बनून नव्या पिढीला प्रेरणा देईल, यात शंका नाही.

१९८० च्या ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू झफर इक्बाल म्हणाले, भारत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. आता आमचे खेळाडू उच्च दर्जाची हॉकी खेळतात, यात शंका नाही.  जर्मनीे, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि नेदरलँड यांच्याविरुद्ध खेळून जिंकू शकतो, असा विश्वास खेळाडूंमध्ये आला आहे.  आघाडीचे चार-पाच संघ एकसारखा खेळ करतात. भारताने ऑलिम्पिक कांस्य जिंकून स्वत:ला सिद्ध केले.  विश्वचषक जिंकण्याची जिद्द , कुवत आणि विश्वास  या संघात असल्याने भारतीय संघ चषक उंचावेल, असा मला विश्वास वाटतो.१९७५ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार अजितपालसिंग यांनी मात्र विश्वचषकात कुठलाच संघ प्रबळ दावेदार समजला जात नाही, असे मत मांडले. ते म्हणाले, मी यावेळी कोण प्रबळ दावेदार असेल हे सांगू शकणार नाही.  भारताकडे चांगली संधी आहे. मात्र, आमच्या खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. सर्वोत्कृष्ट खेळ करीत बलाढ्य संघांना हरवा, यासाठी मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो.ध्यानचंद यांचे सुपुत्र आणि ऑलिम्पिक खेळाडू अशोक कुमार म्हणाले,  भारतीय संघ फॉर्ममध्ये असून, चांगल्या संघांना नमविण्याची त्यांच्यात ताकद आहे. भारतीय संघ अव्वल तीन संघांमध्ये राहील, असा मला विश्वास वाटतो. ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा अनुभव फार मोठा असतो. या बळावर भारताला देखील जेतेपदाची संधी असेल.