शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

भारतीय हॉकी संघ नव्या पिढीसाठी विश्वचषक जिंकेल!; क्रीडामंत्री, माजी खेळाडूंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 06:15 IST

१९८० च्या ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू झफर इक्बाल म्हणाले, भारत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.

नवी दिल्ली : १९७५ व्या विश्वविजयाची पुनरावृत्ती करीत २०२३ ला मायदेशात भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून नव्या पिढीसाठी प्रेरणास्पद कामगिरी नक्की करेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि हॉकीतील माजी दिग्गजांनी शुक्रवारी व्यक्त केला. १३ ते २९ जानेवारी या कालावधीत भुवनेश्वर आणि राऊरकेला येथे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. 

विश्वचषकातील ट्रॉफीचे अनावरण केल्यानंतर  क्रीडामंत्री म्हणाले, ‘भारतीय संघ सज्ज असून अन्य १५ संघांचे आव्हान मोडीत काढण्याची आमच्या खेळाडूंची तयारी आहे. माझ्या मते, मायदेशात आमचा संघ विश्वविजेता नक्की बनू शकतो. भारतीय संघाची तयारी, खेळाडूंमधील नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहून मला विश्वास आहे की भारत विश्व चॅम्पियन बनेल.  आम्ही विश्वचषक आणि आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करू,’

भारताने ४७ वर्षांआधी १९७५ ला क्वालालम्पूर येथे विश्वचषक जिंकला होता. ठाकूर पुढे म्हणाले, ‘या प्रतिष्ठित ट्रॉफीचे अनावरण करताना मी आनंदी आहे.  ही स्पर्धा फारच शानदार होईल, असा विश्वास वाटतो.  आम्ही सर्वोत्कृष्ट असे आयोजन करू.  शानदार आयोजन आणि सर्वोत्तम खेळाच्या बळावर आमचा संघ चॅम्पियन बनून नव्या पिढीला प्रेरणा देईल, यात शंका नाही.

१९८० च्या ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू झफर इक्बाल म्हणाले, भारत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. आता आमचे खेळाडू उच्च दर्जाची हॉकी खेळतात, यात शंका नाही.  जर्मनीे, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि नेदरलँड यांच्याविरुद्ध खेळून जिंकू शकतो, असा विश्वास खेळाडूंमध्ये आला आहे.  आघाडीचे चार-पाच संघ एकसारखा खेळ करतात. भारताने ऑलिम्पिक कांस्य जिंकून स्वत:ला सिद्ध केले.  विश्वचषक जिंकण्याची जिद्द , कुवत आणि विश्वास  या संघात असल्याने भारतीय संघ चषक उंचावेल, असा मला विश्वास वाटतो.१९७५ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार अजितपालसिंग यांनी मात्र विश्वचषकात कुठलाच संघ प्रबळ दावेदार समजला जात नाही, असे मत मांडले. ते म्हणाले, मी यावेळी कोण प्रबळ दावेदार असेल हे सांगू शकणार नाही.  भारताकडे चांगली संधी आहे. मात्र, आमच्या खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. सर्वोत्कृष्ट खेळ करीत बलाढ्य संघांना हरवा, यासाठी मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो.ध्यानचंद यांचे सुपुत्र आणि ऑलिम्पिक खेळाडू अशोक कुमार म्हणाले,  भारतीय संघ फॉर्ममध्ये असून, चांगल्या संघांना नमविण्याची त्यांच्यात ताकद आहे. भारतीय संघ अव्वल तीन संघांमध्ये राहील, असा मला विश्वास वाटतो. ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा अनुभव फार मोठा असतो. या बळावर भारताला देखील जेतेपदाची संधी असेल.