शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास भारत सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:27 IST

पहिल्या टप्प्यातील अंतिम लढतीत पत्करावा लागलेला पराभव विसरून भारतीय संघ चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या दुस-या टप्प्यातील सलामी लढतीत यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास सज्ज झाला आहे.

हॅमिल्टन : पहिल्या टप्प्यातील अंतिम लढतीत पत्करावा लागलेला पराभव विसरून भारतीय संघ चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या दुस-या टप्प्यातील सलामी लढतीत यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास सज्ज झाला आहे.पहिल्या टप्प्यात भारताने जपानचा ६-० ने पराभव केला, पण पुढच्या लढतीत बेल्जियमविरुद्ध ०-२ ने पराभूत झाला. यजमान न्यूझीलंडविरुद्ध ३-१ ने सरशी साधत भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवले. साखळी फेरीत भारताने ९ गोल नोंदविले आणि तीन स्वीकारले. बेल्जियमने १० गोल नोंदविले आणि सहा स्वीकारले. भारताने साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले होते.भारताचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी पहिल्या टप्प्यातील कामगिरीबाबत सांगितले, ‘एक संघ म्हणून प्रत्येक लढतीत आमच्या कामगिरीत सुधारणा झाली. भारतीय संघात चार युवा खेळाडू होते. आम्हाला आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला पराभूत करण्याची संधी होती. आमचा आत्मविश्वास उंचावला आहे.’बेल्जियम पूर्ण क्षमतेने या स्पर्धेत सहभागी झाला आहे. जगातील सर्वोत्तम संघांपैकी तो एक आहे. आमच्याकडे असलेल्या संघाचा विचार करता त्यांच्यासोबत तुल्यबळ लढत देणे मोठे यश आहे. या युवा संघाने जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध खेळण्याचा विश्वास दाखविला. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध झाले आहेत. - शोर्ड मारिन,मुख्य प्रशिक्षक भारत

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतNew Zealandन्यूझीलंड