शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Hockey World Cup 2018: भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का, पण...

By स्वदेश घाणेकर | Updated: December 3, 2018 09:48 IST

Hockey World Cup 2018 : भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: भारतीय पुरुष हॉकी संघाने हॉकी विश्वचषक स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी केली. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियम संघाला त्यांनी 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.

- स्वदेश घाणेकर

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: भारतीय पुरुष हॉकी संघाने हॉकी विश्वचषक स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी केली. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियम संघाला त्यांनी 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. गोल्सची वेळ पाहता बेल्जियमने भारताचा विजयाचा घास पळवला असे अनेकांना वाटेल, परंतु भारताने 0-1 अशा पिछाडीवरून मारलेली मुसंडी बेल्जियमला थक्क करणारी ठरली. या निकालासह भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. पण, त्यांचा हा उपांत्यपूर्व फेरीतील थेट प्रवेश जर-तरच्या समीकरणात अडकला आहे. 

पहिल्या 30 मिनिटांच्या खेळात भारताचा खेळ समाधानकारक झाला नाही. बेल्जियमने पहिल्या सेकंदापासून सामन्यावर घेऊ पाहिलेली पकड, भारतीय खेळाडूंना चक्रावून सोडणारी होती. त्यामुळे त्यांना गोल खावा लागला, परंतु मध्यंतरानंतर भारतीय खेळाडूंनी चमत्कारिक खेळ केला. हाफ टाईमच्या ब्रेकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेला आक्रमणाचा निर्धार शेवटपर्यंत कायम राखला. भारताने उत्तम समन्वयाचा खेळ केला. वरूण कुमार, ललित उपाध्याय, कोठाजीत सिंग यांचा खेळ महत्त्वाचा ठरला. सिमरनजीय सिंगने योग्य वेळी योग्य ठिकाणी उभे राहून केलेला गोल महत्त्वाचा ठरला.

भारताने 31 वेळा बलाढ्य बेल्जियमचा सामना केला आणि भारताने 13 विजय मिळवले आहेत. आजचा निकाल पकडता चार सामने अनिर्णीत राखले आहेत, तर 14 सामने गमावले आहेत. यापैकी मागील पाच वर्षांत 19 सामन्यांत भारताला 13 पराभव पत्करावे लागलेत. त्यामुळे आजचा हा निकाल बरेच काही सांगणारा आहे. भारतीय खेळाडूंची सर्वात कमकुवत बाब म्हणजे त्याची फिटनेस... पण रविवारच्या सामन्यात भारतीय खेळाडू त्याही परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांच्यासमोर बेल्जियमचे खेळाडू दमले. त्यामुळे 2-1 अशा आघाडीनंतर 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागूनही भारताने जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या बेल्जियमला रोखलं, असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

या निकालाने भारताला 'C' गटात 4 गुणांसह आघाडीवर ठेवले आहे. बेल्जियमच्या खात्यातही 4 गुण आहेत, परंतु भारताचा गोलफरक हा 5 असा आहे. बेल्जियमचा गोलफरक 1 असा आहे. त्यामुळे भारताचे उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवणे जवळपास पक्के आहे. त्यासाठी भारताला शेवटच्या साखळी सामन्यात 1-1 अशी बरोबरीही पुरेशी आहे. मात्र, त्याचवेळी बेल्जियमने अखेरच्या साखळी सामन्यात 6 पेक्षा अधिक गोलफरकाने विजय मिळवल्यास भारताचा प्रवेश लांबणीवर पडेल. 

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धा