शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एफआयएच सिरीज हॉकी :भारतीय महिला अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:03 IST

ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

हिरोशिमा : ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या विजयासह भारताने टोकियो आॅलिम्पिक पात्रतेची देखील अंतिम फेरी गाठली आहे.या स्पर्धेतील आघाडीचे दोन्ही संघ यंदा २०२० आॅलिम्पिकच्या अंतिम पात्रता फेरीत खेळणार आहेत. गुरजीत कौरने २० आणि २२ व्या मिनिटाला तसेच नवनीत कौरने ३१ व्या आणि कर्णधार राणी रामपालने ५७ व्या मिनिटाला गोल केला. चिलीकडून कॅरोलिना गार्सियाने १८ व्या तसेच मॅन्यूएला उरोजने ४३ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदविला. भारतीय संघ आता जपानविरुद्ध खेळणार आहे.यजमान जपानने दुसऱ्या उपांत्य सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियावर ३-१ ने विजय साजरा केला. उभय संघ निर्धारित ६० मिनिटात १-१ ने बरोबरीत होते. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारताने पहिल्या १५ मिनिटात प्रतिस्पर्धी संघांवर सहावेळा हल्ले केले पण त्याचा काहीही लाभ झाला नाही. चिली संघाने देखील चारवेळा भारताच्या गोलफळीवर हल्ला केला पण त्यांनाही लाभ होऊ न शकल्याने पहिल्या क्वॉर्टरमध्ये गोल होऊ शकला नव्हता.दुसºया क्वॉर्टरच्या तिसºया मिनिटाला चिलीकडून कॅरोलिनाने गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे आश्चर्यचकित झालेल्या भारतीय खेळाडूंनी २२ व्या मिनिटाला बरोबरी साधली. गुरजीतने हा गोल केला. सहा मिनिटानंतर नवनीतने आणखी एक गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. सहा मिनिटांचा खेळ होत नाही तोच गुरजीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून आघाडी ३-१ अशी केली.चिली संघाने देखील दोनदा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळविली पण त्याचा त्यांना लाभ होऊ शकला नाही. मॅन्युएला उरोजने दुसरा गोल ४३ व्या मिनिटाला केला. भारताची कर्णधार राणी रामपाल हिने ५७ व्या मिनिटाला गोल नोंदविताच आघाडी ४-२ अशी झाली.लालरेमसियानीच्या वडिलांना विजय समर्पित...भारतीय संघाने हा विजय सहकारी खेळाडू लालरेमसियानी हिच्या वडिलांना समर्पित केला. त्यांचे शुक्रवारी निधन झाले. राणीने या युवा स्ट्रायकरची प्रशंसा केली. वडिलांच्या निधनानंतर मायदेशी न परतता लालरेमसियानी हिने संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. राणी म्हणाली, ‘लालरेमसियानी हिने आपले वडील गमावले. पण संघासोबत थांबण्याचा निर्णय घेतला. हा विजय त्यांना समर्पित आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. लालरेमसियानीचा खेळ अप्रतिम असून आम्हाला तिच्यावर गर्व आहे. अंतिम फेरी गाठल्याचा सर्व खेळाडूंना आनंद वाटतो.’

टॅग्स :IndiaभारतHockeyहॉकी