शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

आशियाडमध्ये पदक जिंकणे आव्हानात्मक - सरदारसिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 06:15 IST

मागच्या आशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताला थेट आॅलिम्पिक पात्रता मिळवून देणारा माजी कर्णधर आणि मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदारसिंग याने इंडोनेशियात सुवर्ण जिंकणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : मागच्या आशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताला थेट आॅलिम्पिक पात्रता मिळवून देणारा माजी कर्णधर आणि मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदारसिंग याने इंडोनेशियात सुवर्ण जिंकणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे. भारतीय संघ आशियाई देशांमध्ये प्रबळ दावेदार म्हणून खेळणार असला तरी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल, असे सरदारचे मत आहे.तो म्हणाला, ‘भारत या स्पर्धेत सर्वांत प्रबळ दावेदार म्हणून उतरणार असला तरी मैदानावर सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागेल. येथे सुवर्ण जिंकून टोकियो आॅलिम्पिकची थेट पात्रता गाठणे कडवे आव्हान असेल. आम्ही अलीकडे कोरिया आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका तसेच एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगले निकाल दिले. पण अनेक क्षेत्रांत सुधारणेस वाव आहे. सराव शिबिरादरम्यान उणिवा दृूर करू.’खेळाडू आशियाडबद्दल रोमांचित असून कोचने जे सांगितले त्यावर काम केल्यास आणि बेसिक्सवर कायम राहून खेळ केल्यास आशियाई संघांमध्ये आम्ही सरस ठरू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीत रौप्य पदक मिळाल्याने आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याचा आत्मविश्वास मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीत आम्ही दिग्गज खेळाडूंना नमविल्याने आशियाडमध्ये आणखी दमदार कामगिरी करण्याचा विश्वास लाभला. पण त्याचवेळी कुठल्याही संघाला सहज घेण्याची आम्ही चूक करणार नाही.’हरेंद्रसिंग कोच बनल्यामुळे संघावर काय परिणाम होईल, असे विचारताच सरदार म्हणाला, ‘आमच्या संघात झुंजारवृत्ती आली आहे. खेळाडूंमध्ये समन्वय असून मैदानावर त्याचा लाभ होईल. हरेंद्रसिंग यांना मी १५ वर्षांपासून ओळखतो. तेदेखील माझ्या खेळातील बलस्थाने आणि उणिवा जाणतात. सिनियर या नात्याने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे माझे कर्तव्य आहे. याच गोष्टींमुळे माझा आत्मविश्वाास उंचावतो.’ (वृत्तसंस्था)ओडिशा येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित विश्वचषकाबद्दल विचारताच सरदार म्हणाला, ‘यंदा आशियाडनंतर आम्हाला विश्वचषक खेळायचा आहे. विश्वचषक महत्त्वपूर्ण असून सध्या तरी आमचे लक्ष आशियाडच्या सुवर्णावर आहे. त्यानंतर आशियाडची तयारी करू.’ 

टॅग्स :Hockeyहॉकीnewsबातम्या