शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आशियाडमध्ये पदक जिंकणे आव्हानात्मक - सरदारसिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 06:15 IST

मागच्या आशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताला थेट आॅलिम्पिक पात्रता मिळवून देणारा माजी कर्णधर आणि मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदारसिंग याने इंडोनेशियात सुवर्ण जिंकणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली : मागच्या आशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताला थेट आॅलिम्पिक पात्रता मिळवून देणारा माजी कर्णधर आणि मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदारसिंग याने इंडोनेशियात सुवर्ण जिंकणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे. भारतीय संघ आशियाई देशांमध्ये प्रबळ दावेदार म्हणून खेळणार असला तरी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल, असे सरदारचे मत आहे.तो म्हणाला, ‘भारत या स्पर्धेत सर्वांत प्रबळ दावेदार म्हणून उतरणार असला तरी मैदानावर सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागेल. येथे सुवर्ण जिंकून टोकियो आॅलिम्पिकची थेट पात्रता गाठणे कडवे आव्हान असेल. आम्ही अलीकडे कोरिया आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका तसेच एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगले निकाल दिले. पण अनेक क्षेत्रांत सुधारणेस वाव आहे. सराव शिबिरादरम्यान उणिवा दृूर करू.’खेळाडू आशियाडबद्दल रोमांचित असून कोचने जे सांगितले त्यावर काम केल्यास आणि बेसिक्सवर कायम राहून खेळ केल्यास आशियाई संघांमध्ये आम्ही सरस ठरू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीत रौप्य पदक मिळाल्याने आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याचा आत्मविश्वास मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीत आम्ही दिग्गज खेळाडूंना नमविल्याने आशियाडमध्ये आणखी दमदार कामगिरी करण्याचा विश्वास लाभला. पण त्याचवेळी कुठल्याही संघाला सहज घेण्याची आम्ही चूक करणार नाही.’हरेंद्रसिंग कोच बनल्यामुळे संघावर काय परिणाम होईल, असे विचारताच सरदार म्हणाला, ‘आमच्या संघात झुंजारवृत्ती आली आहे. खेळाडूंमध्ये समन्वय असून मैदानावर त्याचा लाभ होईल. हरेंद्रसिंग यांना मी १५ वर्षांपासून ओळखतो. तेदेखील माझ्या खेळातील बलस्थाने आणि उणिवा जाणतात. सिनियर या नात्याने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे माझे कर्तव्य आहे. याच गोष्टींमुळे माझा आत्मविश्वाास उंचावतो.’ (वृत्तसंस्था)ओडिशा येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित विश्वचषकाबद्दल विचारताच सरदार म्हणाला, ‘यंदा आशियाडनंतर आम्हाला विश्वचषक खेळायचा आहे. विश्वचषक महत्त्वपूर्ण असून सध्या तरी आमचे लक्ष आशियाडच्या सुवर्णावर आहे. त्यानंतर आशियाडची तयारी करू.’ 

टॅग्स :Hockeyहॉकीnewsबातम्या