शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

अझलन शाह हॉकी : भारताच्या पदकाचा आशा संपुष्टात; आयर्लंडकडून पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 19:45 IST

भारताला आयर्लंडकडून 2-3 असा फरकाने पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांना स्पर्धेत पहिल्या तीन संघांमध्ये स्थान मिळवता येणार आहे.

ठळक मुद्देशनिवारी पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी भारताला लढत द्यावी लागणार आहे.

नवी दिल्ली : अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. भारताला आयर्लंडकडून 2-3 असा फरकाने पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांना स्पर्धेत पहिल्या तीन संघांमध्ये स्थान मिळवता येणार आहे. शनिवारी पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी भारताला लढत द्यावी लागणार आहे.

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताकडे दोनदा आघाडी होती, पण या आघाडीचा फायदा भारताला उचलता आला नाही. भारताने सामन्याच्या सुरुवातीला 1-0 अशी आघाडी मिळवली होती, त्यानंतर आयर्लंडने 1-1 अशी बरोबरी साधली तरी भारताने त्यानंतर 2-1 अशी आघाडी घेतली होती. पण अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताला चांगली कामगिरी करता आली नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.

भारताच्या रमणदीप सिंगने सामन्याच्या दहाव्या मिनिटाला गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आयर्लंडच्या शेन ओ डोनोग्यू याने गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. पण त्यानंतर दोन मिनिटांनीच भारताच्या अमित रोहिदासने गोल केला आणि भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

सामन्याच्या 26व्या मिनिटाला भारताकडे 2-1 अशी आघाडी होती. त्यानंतर दहा मिनिटांमध्ये जोरदार आक्रमण पाहायला मिळाले. पण 10 मिनिटांमध्ये एकही गोल झाला नाही. त्यानंतर सामन्याच्या 36व्या मिनिटाला आयर्लंडच्या सीन मरेने गोल केला आणि भारताबरोबर 2-2 अशी बरोबरी साधली. 

भारताबरोबर 2-2 अशी बरोबरी झाल्यावर आयर्लंडकडून जोरदार आक्रमण पाहायला मिळाले. सामन्याच्या 42 व्या मिनिटाला ली कोलने गोल करत आयर्लंडला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मिळवल्यावर आयर्लंडने बचावावर अधिक भर दिला. अखेरच्या मिनिटांमध्ये भारताने आक्रमण केले, पण त्यांना आयर्लंडचा बचाव भेदता आला नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

टॅग्स :Hockeyहॉकी