शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आशिया चषक महिला हॉकी: चीनवर विजयासाठी भारत सज्ज, आज अंतिम सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 03:34 IST

विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यास संघ उत्सुक आहे.

काकामिगहरा, जपान : विजयरथावर स्वार असलेल्या भारतीय महिला संघ रविवारी चीनविरोधात आशिया चषकात अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज असेल. आठ वर्षांपूर्वी भारतीय संघाला विजेतेपदासाठीच्या सामन्यात चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यास संघ उत्सुक आहे.भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यात विजय मिळवाला. उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्यफेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्या संघाने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०,चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते.भारतीय संघ याआधी २००९ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते. गेल्या वेळी २०१३ मध्ये क्वालालंपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत तिसºया स्थानी होता. भारताने आतापर्यंत २००४ मध्ये एकदाच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.भारताने पुढच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या महिला विश्वचषकासाठीची पात्रता मिळवली आहे. कर्णधार राणी रामपॉल हिने सांगितले की आम्ही या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठीच उद्याच्या सामन्यात खेळणार आहोत. आम्ही आशिया विजेते बनून विश्वचषकात जागा मिळवण्यास उत्सुक आहोत. पुरुष संघाने आशिया चषक जिंकल्याने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.ड्रेसिंग रूमचे वातावरण खूपच चांगले आहे. आम्ही उत्साहित आहोत आणि अंतिम सामन्यासाठी पूर्ण तयार आहोत.’राणी पुढे म्हणाली की, ‘जपान विरोधातील सामना खूूपच चांगला होता. चांगली सुरुवात सगळ्यात जास्त गरजेची असते. संघातील प्रत्येक खेळाडूने या योगदान दिले आहे. आमच्या प्रशिक्षकांनी बनवलेल्या रणनीतीनुसार आम्हाला खेळ करावा लागेल आणि चुका होणार नाही याची काळजीदेखील घ्यावी लागेल. ’राणीने सांगितले, ‘आम्हाला माहीत आहे की, चीनचा संघ चांगला आहे आणि उलटफेर करू शकतो.(वृत्तसंस्था)आम्ही त्यांना आधी पराभूत केले आहे. म्हणून आताही करू शकतो, असे नाही. आम्ही रणनीती तयार केली आहे. आणि आमचे त्यावरच फोकस आहे.’गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियन्स चषकात चीनने भारतात साखळी फेरीत पराभूत केले होते. मात्र त्यानंतर अंतिम सामन्यात भारताने चीनवर विजय मिळवला होता.

टॅग्स :Hockeyहॉकी