शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
3
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
4
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
5
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
6
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
7
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
8
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
9
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
10
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
11
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
12
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
13
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
14
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
15
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
16
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
17
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
18
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
19
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
20
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या

युवकांनी पुढाकार घ्यावा- वाकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:11 IST

महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तरूणाईने पुढाकार घेतला पाहिजे. राजकारण वाईट आहे, असे सातत्याने तरूणाईवर बिंबवले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तरूणाईने पुढाकार घेतला पाहिजे. राजकारण वाईट आहे, असे सातत्याने तरूणाईवर बिंबवले जाते. परंतु राजकारणाशिवाय विकासाची संकल्पना कोसोदूर असल्याने प्रस्थापित राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीका करत महाराष्ट्राच्या नवनिमार्णासाठी युवकांनी पुढाकार घेतला घेण्याचे आवाहन ५ जानेवारी रोजी जिजाऊ व्याख्यानमालेतून कवी व लेखक ज्ञानेश वाकोडकर यांनी केले.हिंगोली येथील अ‍ॅड. ग्यानबाराव सिरसाट विचारमंच महावीर भवन येथे ५ जानेवारी रोजी जिजाऊ व्याख्यानमालेचे शेवटचे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उद्घाटक सा.बां.चे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, तसेच जिल्हाध्यक्ष सतीश जाधव पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव ढोकर पाटील, खंडेराव सरनाईक आदी उपस्थित होते. युवा महाराष्ट्र नवा महाराष्ट्र या विषयावर बोलताना ज्ञानेश वाकोडकर म्हणाले, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली लोकशाही राज्य आले पाहिजे. लोकशाही प्रधान देशात शेतकरी आत्महत्या, रोजगारांचे प्रश्न, गरीब-श्रीमंतांची दरी अशा अनेक बाबींवर वाकुडकर यांनी कवीतेून प्रहार केला.कविता सादर करत ते म्हणालेमी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. काही स्वप्न स्वस्त तर काही स्वप्न महाग लावणार आहे. झोपडीतल्या देवाची शपथ, महालातल्या देवांना मी आग लावणार आहे.या प्रकारे त्यांनी कविता सादर करून प्रबोधन केले.अंधश्रद्धेविषयी बोलताना ते म्हणाले प्रत्येकांनीच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे. पंचाग पाहणारे ज्योतिष्य पोपटाच्या भरवशावर तुमचे भविष्य सांगतात. तरी सुद्धा तुम्ही विश्वास ठेवता, हे चुकीचे आहे. धर्माला दोष देऊन फायदा नाही. सर्वांनी चिकित्सक बुद्धीने विचार करणे गरजेचे आहे. विशेषत: यासाठी तरूणाईने पुढाकार घेतला पाहिजे. एकीकडे राजकारणी लोकांना बदमाश म्हणायचे आणि त्यांनाच मतदान करायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुळात राजकारण वाईट नसतं. फक्त त्या माध्यमातून वाईट कामे केली जातात. असे मत वाकोडकरांनी व्यक्त केले.संचालन पंडित अवचार, गोपाल इंगळे, जिजाऊ वंदना डॉ. ऋतुजा वायचाळ, प्रास्ताविक सतीश पाटील, पडोळे यांनी केले. आभार पंडित सिरसाट यांनी मानले.शासन दरबारी हिंगोली जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा म्हणून आहे. मानव विकास निर्देशांकही कमी आहे. मला हिंगोलीचे नागरिक आवडतात. ते छोट्या गोष्टीतही समाधानी राहतात. परंतु सर्वांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे. प्रशासन दुष्काळ, पाणीटंचाई अशा सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. मागासलेला जिल्हा ही ओळख आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिटविता येईल, असे त्यांनी सांगितले. जिजाऊ व्याख्यानमालेविषयी बोलताना ते म्हणाले मराठा सेवा संघाच्या वतीने मागील १९ वर्षांपासून स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक