शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

शिवरायांचा आदर्श घेवून तरुणाईने राजकारणात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST

हिंगोली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेवून राजेशाहीतही आजच्या लोकशाहीला लाजवेल असे लोककल्याणकारी राज्य सोळाव्या शतकात उभे केले ...

हिंगोली : छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेवून राजेशाहीतही आजच्या लोकशाहीला लाजवेल असे लोककल्याणकारी राज्य सोळाव्या शतकात उभे केले होते. आजच्या तरुणाईने समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही सामाजिक मूल्ये रुजविण्यासाठी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेवून राजकारणात यावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव केले.

जिजाऊ व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्पात ते बोलत होते. राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत येथील राजे संभाजी महाविद्यालयात मॉ साहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे, उद्घाटक अ‍ॅड. केशव सिरसाट, प्रमुख उपस्थिती म्हणून माधव जाधव, संतोष बुद्रुक पाटील, खंडेराव सरनाईक, प्रा.सुधाकर इंगोले, जयप्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती. जाधव म्हणाले की, जगातील सर्व क्रांती तरुणाईने केल्या आहेत. पण, आजची तरुणाई मात्र राजकारणाला वाईट म्हणून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुणाईने राजकीय अंधश्रद्धेतून बाहेर पडून लोककल्याणासाठी राजकारणात आले पाहिजे. तथागत गौतम बुद्धांपासून संत गाडगेबाबांपर्यंत महापुरुषांच्या विचारांचा ठेवा आपल्या पाठीशी असताना शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांच्या पाठीमागे फिरू नये. सध्या पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा असा व्यवसाय सुरू आहे. याला तिलांजली द्यायची असेल तर राजकारण तत्त्वाचे असावे, तडजोडीचे नाही, असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन महेश राखोंडे, जिजाऊवंदना अंजली कावरखे, प्रास्ताविक माधव जाधव, व्याख्यात्याचा परिचय विश्वजित घोडके शिवराज सरनाईक यांनी आभार मानले.