शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

मटक्याच्या पैशातून ‘त्या’ युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:22 IST

वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदा : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे.वाई गोरखनाथ येथील यूवक नागराज खंदारे (२८) याचा मृतदेह चोंडी रेल्वेस्टेशन येथील वन विभागाच्या कार्यालय परिसरात सापडला होता. मयत हा मिस्त्री काम करतो. त्याला मटका लागला होता. त्यामुळे मटका एजन्टकडे पैसे मागण्यासाठी तो गेला असता मटका एजन्ट व मयत नागराज खंदारे यांच्यामध्ये वाद झाला. मटक्याची उधारी देण्यावरुन झालेल्या वादानंतर पाच जणांनी मिळून लाथाबुक्याने मारहाण केली होती. त्यात मयत नागराज खंदारे हा जागीच मरण पावला आहे. ही घटना ३१ आॅक्टोबर रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घडली होती. सकाळी १ नोव्हेंबर रोजी मयताचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. काही संशयीतांना पोलिसांनी त्याच दिवशी ताब्यात घेऊन चौकशी केली. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. सदर घटनेमुळे मागील काही दिवसांपासून परिसरात उलटसुलट चर्चेला ऊत आला होता. अखेर याप्रकरणी पाचव्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी बाबाराव खंदारे यांच्या फिर्यादीवरुन करुंदा पोलीस ठाण्यात आरोपी राहुल सरोदे, अशोक सरोदे, संदीप मोरे, सुमित सरोदे, राहुल मगरे (सर्व रा. चोंढी रेल्वेस्टेशन) या पाच जणांविरोधात भादंवि कलम ३०२, २०१,१०९, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. मटक्याचा जुगार लागला होता त्यातून या मयताचा बळी गेला आहे. या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशिराने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अजून फरारच आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.४७ वाहनचालकांवर कारवाई; दंड वसूलहिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ४७ वाहन चालकांकडून पोलिसांनी ९ हजार ४०० रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहीम राबविण्यात येते. त्या अनुषंगाने मंगळवारी ही कारवाई केली.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी