शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पुढाऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांनी पेटविले राजकीय वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 18:31 IST

‘भाव’ न मिळालेले उट्टे काढणार

ठळक मुद्देधुसफूस वाढू लागली 

हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक सक्रिय झाले आहेत. जनतेच्या विविध प्रश्नांवर ही मंडळी झडगताना दिसू लागली आहे. काहीजण तर पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहे. मात्र सर्वच पक्षांमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून कोणाचे तिकिट कापणार आणि कुणाला मिळणार? यावर खल होताना दिसत आहे.

शिवसेना व भाजपचा विजयी अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंडळींनी कंबर कसली आहे. कुणी उघड तर कुणी आतून संधान बांधून विजयाची गणिते आखत आहे. या निवडणुकीत भाजपची धुसपूस आता चव्हाट्यावर येण्याच्या मार्गावर आहे. हिंगोलीत काही भाजपची मंडळी वेगळी चूल मांडायची तयारी करीत आहे. आमदार व नगराध्यक्षांमध्येही बेबनावाचे वारे वाहू लागले आहे. आतापर्यंत काँग्रेसलाच असलेली ही लागण भाजपमध्ये चांगलीच फोफावली आहे. शिवाय उजव्या व डाव्यांच्या खेळात उजव्यांना एका छत्राखाली आणण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कळमनुरीतही माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, डॉ.जयदीप देशमुख, वसंतराव देशमुख, पी.आर. देशमुख अशी लांबलचक यादी आहे.

एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरा नाराज होणार असाच एकंदर प्रकार आहे. वसमतला मात्र एकमेव अ‍ॅड.शिवाजी जाधव हेच दावेदार आहेत. मात्र त्यांना सेनेची उमेदवारी मिळणार असल्याची मध्येच हूल उठत आहे. कळमनुरीतही अशाच प्रकारे अ‍ॅड. शिवाजी माने यांचे नाव सेनेकडून चर्चेत येत आहे. विद्यमान खा.हेमंत पाटील यांनी अजूनही खऱ्या अर्थाने हिंगोलीला आपलेसे केले नसले तरीही त्यांच्याच नावावर या बाबी पसरत आहेत. या अफवा की सत्यता हे आगामी काळातच कळणार आहे. मात्र यामुळे शिवसेनेचे वसमतचे आ.जयप्रकाश मुंदडा व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. काहीजण तर आता सेनेला आमदारकीलाही बाहेरूनच उमेदवार आणले तर निवडून येतील, असा उपहासात्मक टोला मारत आहेत.

वसमतला सेनेतील इतर काहींच्या आकांक्षांनाही धुमारे फुटले आहेत. ते आ.मुंदडा यांचे कार्यकर्ते म्हणून राहण्यापेक्षा रिंगणात उतरायची तयारी करीत आहेत. मात्र तिकिट सेनेचेच पाहिजे, अशी मानसिकता दिसत आहे. कळमनुरीत संतोष बांगर यांच्यानंतर केवळ गोपू पाटील सावंत यांनीच दावेदारी केली आहे. हिंगोलीत सेनेच्या रुपाली पाटील गोरेगावकर व रामेश्वर शिंदे या दोघांची नावे चर्चेत आली आहेत. यावेळी शिवसेनेलाही वेगळे लढण्याची आस असून तसे न झाल्यास बंडखोरीचा मार्ग अवलंबला जाण्याची शक्यता वाढली आहे. अनेक कार्यकर्तेही ही भाषा बोलत असून भाजपला जागा दाखवायची खुमखुमी जागी झाल्याचे दिसत आहे. 

काँग्रेसला हिंगोलीत इच्छुकांचा उत आला आहे. सतत पंधरा वर्षे आमदार राहिलेल्या व मागच्या वेळी पराभूत भाऊराव पाटील यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शिवाय ज्याला  काँग्रेसची उमेदवारी मिळाली त्याचे काम इतर करतीलच, असे काही दिसत नाही. कळमनुरीत काँग्रेसने आ.संतोष टारफे यांना कामाला लागण्याचा आदेश दिला. मात्र वेगवेगळ्या दिशेला तोंडे असलेल्या कार्यकर्त्यांना एका दिशेने नेण्याची कवायत त्यांना करावी लागणार आहे. वसमतमध्ये डॉ.एम.आर.क्यातमवार यांच्या रुपाने नवा चेहरा काँग्रेसकडून चर्चेत आला आहे. 

राष्ट्रवादीही जिल्ह्यातील सर्वच जागांची तयारी करीत आहे. हिंगोलीत आ.रामराव वडकुते, कळमनुरीत दिलीप चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. वसमतला मात्र माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व राजू पाटील नवघरे ही दोन नावे चर्चेत आहेत. येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतील हेवेदावे पराकोटीचे असून अजूनही कायम असल्याचे दिसत आहेत. काहींनी तर आधीच पक्षही सोडला आहे. कळमनुरीत तर राकाँला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. हिंगोलीत मागच्या वेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राकाँला यावेळी विजयाची गणिते जुळवायची तर आधी शहरी व ग्रामीण कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करावी लागणार आहे. काहीजण रोजच पक्षांतराची ढोस देत आहेत.

वंचितला चांगल्या चेहऱ्यांचा शोधहिंगोली लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीने चांगली मते मिळविली ते विधानसभा मतदारसंघ हिंगोली जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे वंचितनेही लक्ष केंद्रित केले आहे. चांगल्या चेहऱ्यांचा शोध भारिप व एमआयएमकडून घेतला जात आहे.४ अजित मगर, फैजल पटेल, गोविंद भवर अशा अनेक दिग्गजांनी विविध विधानसभांसाठी वंचितकडे उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे वंचितच्या उमेदवारांकडेही लक्ष लागले आहे. सामाजिक गणिते लावून उमेदवारी देणार की कसे? हे अजून गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHingoliहिंगोलीvidhan sabhaविधानसभा