शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

‘गोड बोला’ या शब्दांचा अर्थ तडजोड करणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:57 IST

दरवर्षी मकरसंक्रांती हा सण एक संदेश घेऊन येतो, तो संदेश म्हणजे गोड बोला! या शब्दांचा अर्थ तडजोड करुन गोड बोलणे हा नाही. तर मनाभावातून आपली प्रकृती, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी आपण तणावमुक्त होऊन गोड बोलले पाहिजे, असे साहित्यिक विलास वैद्य म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षी मकरसंक्रांती हा सण एक संदेश घेऊन येतो, तो संदेश म्हणजे गोड बोला! या शब्दांचा अर्थ तडजोड करुन गोड बोलणे हा नाही. तर मनाभावातून आपली प्रकृती, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी आपण तणावमुक्त होऊन गोड बोलले पाहिजे, असे साहित्यिक विलास वैद्य म्हणाले.भारतीय संस्कृतीत अनेक संदेश दडलेले आहेत. ते आत्मसात करुन जीवन व्यतीत केले तर उत्तम कार्य करण्यासाठी एक उर्जा मिळते. ही उर्जा केवळ माणसांच्या गोड बोलण्यातून मिळते. आपण किती बोलतो आणि कीती रागात येतो. याचे प्रत्येकाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. द्वेश, मत्सर, राग हे माणसाचे शत्रू आहेत. या शत्रूपांसून मुक्त होण्याचे काम संक्रांतीसारख्या सणाच्या माध्यमातून होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलवरुन संवाद वाढला आहे. संवादाविना माणूस माणसांपासून तुटत चालला आहे. आणि हाच तुटलेला संवाद जोडण्याचे काम संक्रांतीसारखा सण करतो. माणसांमध्ये वाद होतच असतात पण मतभेद होता कामा नये. वाद व्हावेत पण इतकेही नको की, माणूस पुन्हा एकमेंकाशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करु शकणार नाही. गोड बोलल्याने विचारांना प्रेरणा मिळते. यातून शांत जीवन व्यतित करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे शांत जीवन जगण्यासाठी ‘गोड बोला, गुड बोला’ हा उपक्रम मोठी भूमिका निभावत आहे.एका कविने म्हटले आहे. ‘हेलकावूनही शांत होई पाणी, ती माझी कहाणी’, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात हेलकावे येत असतात पण या हेलकाव्यातून आपण स्थिर, स्थावर आणि शांत होण्याची कला आत्मसात करण्याची गरज आहे. मकरसंक्रांती हा सण परंपरेचा संदेश देतो.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक