शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘गोड बोला’ या शब्दांचा अर्थ तडजोड करणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 23:57 IST

दरवर्षी मकरसंक्रांती हा सण एक संदेश घेऊन येतो, तो संदेश म्हणजे गोड बोला! या शब्दांचा अर्थ तडजोड करुन गोड बोलणे हा नाही. तर मनाभावातून आपली प्रकृती, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी आपण तणावमुक्त होऊन गोड बोलले पाहिजे, असे साहित्यिक विलास वैद्य म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षी मकरसंक्रांती हा सण एक संदेश घेऊन येतो, तो संदेश म्हणजे गोड बोला! या शब्दांचा अर्थ तडजोड करुन गोड बोलणे हा नाही. तर मनाभावातून आपली प्रकृती, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी आपण तणावमुक्त होऊन गोड बोलले पाहिजे, असे साहित्यिक विलास वैद्य म्हणाले.भारतीय संस्कृतीत अनेक संदेश दडलेले आहेत. ते आत्मसात करुन जीवन व्यतीत केले तर उत्तम कार्य करण्यासाठी एक उर्जा मिळते. ही उर्जा केवळ माणसांच्या गोड बोलण्यातून मिळते. आपण किती बोलतो आणि कीती रागात येतो. याचे प्रत्येकाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. द्वेश, मत्सर, राग हे माणसाचे शत्रू आहेत. या शत्रूपांसून मुक्त होण्याचे काम संक्रांतीसारख्या सणाच्या माध्यमातून होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलवरुन संवाद वाढला आहे. संवादाविना माणूस माणसांपासून तुटत चालला आहे. आणि हाच तुटलेला संवाद जोडण्याचे काम संक्रांतीसारखा सण करतो. माणसांमध्ये वाद होतच असतात पण मतभेद होता कामा नये. वाद व्हावेत पण इतकेही नको की, माणूस पुन्हा एकमेंकाशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करु शकणार नाही. गोड बोलल्याने विचारांना प्रेरणा मिळते. यातून शांत जीवन व्यतित करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे शांत जीवन जगण्यासाठी ‘गोड बोला, गुड बोला’ हा उपक्रम मोठी भूमिका निभावत आहे.एका कविने म्हटले आहे. ‘हेलकावूनही शांत होई पाणी, ती माझी कहाणी’, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात हेलकावे येत असतात पण या हेलकाव्यातून आपण स्थिर, स्थावर आणि शांत होण्याची कला आत्मसात करण्याची गरज आहे. मकरसंक्रांती हा सण परंपरेचा संदेश देतो.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक