शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

एक मराठा लाख मराठा! ७० ट्रॅक्टरमधून महिलांचा मोर्चा धडकला वसमत तहसीलवर

By विजय पाटील | Updated: September 12, 2023 15:14 IST

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे सात जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी वसमत तालुक्यातील गिरगाव येथे सात जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. दरम्यान,  गिरगाव येथील गावकऱ्यांनी व महिलांनी मुलाबाळांसह ७० ट्रॅक्टरद्वारे मोर्चा काढून वसमत तहसील गाठले. यानंतर वसमत येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मागच्या तीन दिवसांपासून गिरगाव येथे प्रमोद नादरे, पांडुरंग नादरे, शशिकांत नादरे, गोविंद कऱ्हाळे, नरेश कऱ्हाळे, राहुल कऱ्हाळे, शैलेश वानखेडे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. आतापर्यंत कित्येक सरकारने येवून गेली. परंतु अजूनही मराठा समाजबांधवांचा कोणी प्रश्न सोडविला नाही. दरवर्षी निवडणुका आल्या की नुसते आश्वासन दिले जात आहे. परंतु ठोस पाऊले घेऊन त्यावर कोणी निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या मुला-मुलींना शासनाच्या कोणत्याच सवलती मिळत नाहीत. आरक्षण नसल्यामुळे शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. प्रत्येक वेळी लवकर आरक्षण दिले जाईल, काळजी करण्याचे कारण नाही, असे लोकप्रतिनिधी व शासनकर्ते सांगत आले आहेत, असे मोर्चेकरी महिलांनी सांगितले.

गिरगाव येथून काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चात गिरगावसह परजना, मुरुंबा आदी गावांतील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. वसमत येथे महिलांचा मोर्चा पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपोषणकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांनी पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार शारदा दळवी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोली