शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महिला रुग्णालयात सिझर झालेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:47 IST

नातेवाईकांनी गुन्हा नोंदविण्याची केली मागणी

ठळक मुद्देडॉक्टरांकडून हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप

वसमत (जि. हिंगोली) : येथील महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे सिझर केल्यानंतर तिचे सोमवारी निधन झाल्याने खळबळ उडाली आहे़ मयताच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करीत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे़ मेडिकल बोर्डाच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगून वसमत शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़ 

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील महिला गंगासागर दुर्गादास कांबळे (वय २२) ही महिला प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात दाखल झाली होती़ सदर महिलेची सिझर शस्त्रक्रिया ८ जून रोजी करण्यात आली़ यात तिला मुलगा झाला़; परंतु प्रसूतीनंतर काही वेळांनी सदर महिलेच्या पोटात त्रास सुरू झाला़ यामुळे डॉक्टरांनी उपचार करून महिलेला इंजेक्शन दिले़ यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला़ हा प्रकार डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे झाला असून, संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी नातेवाईक करत होते़ या प्रकरणाचा मेडिकल अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सांगितले़ सुगंधचंद गायकवाड यांच्या तक्रारीवरून  अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.

मृत्यूचे कारण अहवालानंतरच स्पष्ट : डॉ. चव्हाणदरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ वाय़एस़ चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सदर महिलेची प्रसूती शस्त्रक्रिया चांगली झाली असून, चार ते पाच तासांनी तिला त्रास सुरू झाला़ त्रास होत असल्याने डॉक्टरांनी महिलेवर उपचार केले़ मात्र, ही दुर्दैवी घटना घडली़ मृत्यूचे कारण अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीhospitalहॉस्पिटलWomenमहिला