शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी वसतिगृह स्थापन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:01 IST

एकही बालक शाळाबाह्य राहू नये, तसेच शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अशा परिस्थितही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात आहे. त्यामुळे यंदा हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? हा प्रश्नच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकही बालक शाळाबाह्य राहू नये, तसेच शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अशा परिस्थितही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात आहे. त्यामुळे यंदा हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? हा प्रश्नच आहे.ऊसतोडणीची वेळ तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कामगारांचे जथ्थे स्थलांतरासाठी सज्ज होऊ लागले आहेत. ऊसतोडणीसाठी साधारणपणे आॅक्टोबरपासून ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरास सुरुवात होते. जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. शासनाच्या या धोरणामुळे आता हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबियांचे शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता स्थलांतरित कुटुंबियाचे पाल्य नातेवाईकांकडे ठेवले जातील, अशी माहिती आहे.कार्यशाळा : बालरक्षकांना प्रशिक्षणफसवेगिरीला आळा बसावा यासाठी हंगामी वसतिगृहात बायोमेट्रिक यंत्र बसविण्यात आले. काही वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी चुकीचे अहवाल सादर करण्यात आल्याने बायोमेट्रिक यंत्राद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. हंगामी वसतिगृहांची योजना गरजूंपर्यंत पोहचावी हा उद्देश आहे.जिल्ह्यात बालरक्षकांची चळवळ गतिमान करून २०१८-१९ मध्ये एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी तसेच हंगामी वसतीगृहाविना स्थलांतरण रोखण्याच्या शिक्षणाधिकाºयांनी सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी