शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

हंगामी वसतिगृह स्थापन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:01 IST

एकही बालक शाळाबाह्य राहू नये, तसेच शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अशा परिस्थितही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात आहे. त्यामुळे यंदा हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? हा प्रश्नच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकही बालक शाळाबाह्य राहू नये, तसेच शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अशा परिस्थितही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात आहे. त्यामुळे यंदा हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? हा प्रश्नच आहे.ऊसतोडणीची वेळ तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कामगारांचे जथ्थे स्थलांतरासाठी सज्ज होऊ लागले आहेत. ऊसतोडणीसाठी साधारणपणे आॅक्टोबरपासून ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरास सुरुवात होते. जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. शासनाच्या या धोरणामुळे आता हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबियांचे शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता स्थलांतरित कुटुंबियाचे पाल्य नातेवाईकांकडे ठेवले जातील, अशी माहिती आहे.कार्यशाळा : बालरक्षकांना प्रशिक्षणफसवेगिरीला आळा बसावा यासाठी हंगामी वसतिगृहात बायोमेट्रिक यंत्र बसविण्यात आले. काही वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी चुकीचे अहवाल सादर करण्यात आल्याने बायोमेट्रिक यंत्राद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. हंगामी वसतिगृहांची योजना गरजूंपर्यंत पोहचावी हा उद्देश आहे.जिल्ह्यात बालरक्षकांची चळवळ गतिमान करून २०१८-१९ मध्ये एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी तसेच हंगामी वसतीगृहाविना स्थलांतरण रोखण्याच्या शिक्षणाधिकाºयांनी सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी