शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

हंगामी वसतिगृह स्थापन होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:01 IST

एकही बालक शाळाबाह्य राहू नये, तसेच शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अशा परिस्थितही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात आहे. त्यामुळे यंदा हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? हा प्रश्नच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकही बालक शाळाबाह्य राहू नये, तसेच शाळेतील मुला-मुलींची होणारी गळती थांबविण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. अशा परिस्थितही जिल्ह्यात शेकडो मुले शाळाबाह्य आहेत. मात्र बालरक्षक ही संकल्पना गतिमान केली जात आहे. त्यामुळे यंदा हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? हा प्रश्नच आहे.ऊसतोडणीची वेळ तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कामगारांचे जथ्थे स्थलांतरासाठी सज्ज होऊ लागले आहेत. ऊसतोडणीसाठी साधारणपणे आॅक्टोबरपासून ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरास सुरुवात होते. जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तीन ते चार महिन्यांच्या कालावधीसाठी हंगामी वसतिगृहे सुरू करण्यात येतात. परंतु यंदा शिक्षण विभागाकडून बालरक्षक ही संकल्पना राबविली जात आहे. बीड, गेवराई, जालना व चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली बालरक्षक चळवळीची बांधणी करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांना हंगामी वसतिगृहाशिवाय विद्यार्थी स्थलांतरण रोखण्यात यश आले. त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातही बालरक्षक चळवळ गतिमान केली जाणार असून तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. शासनाच्या या धोरणामुळे आता हंगामी वसतिगृहांची स्थापना होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबियांचे शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. तसेच कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आता स्थलांतरित कुटुंबियाचे पाल्य नातेवाईकांकडे ठेवले जातील, अशी माहिती आहे.कार्यशाळा : बालरक्षकांना प्रशिक्षणफसवेगिरीला आळा बसावा यासाठी हंगामी वसतिगृहात बायोमेट्रिक यंत्र बसविण्यात आले. काही वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी चुकीचे अहवाल सादर करण्यात आल्याने बायोमेट्रिक यंत्राद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. हंगामी वसतिगृहांची योजना गरजूंपर्यंत पोहचावी हा उद्देश आहे.जिल्ह्यात बालरक्षकांची चळवळ गतिमान करून २०१८-१९ मध्ये एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी तसेच हंगामी वसतीगृहाविना स्थलांतरण रोखण्याच्या शिक्षणाधिकाºयांनी सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी