शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आम्ही कुणबी; पती मराठा, मग आता तुम्हीच सांगा आमच्या मुलांना काही नाही आरक्षण?

By रमेश वाबळे | Updated: October 30, 2023 18:08 IST

साटंबा येथील कुणबी महिलांनी सरकारपुढे ठेवला यक्ष प्रश्न

हिंगोली : विदर्भातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असून, त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभही मिळतो. परंतु, मराठवाड्यात मात्र त्यांच्या अपत्यांना कुणबी आरक्षणाचा लाभ मिळत नाही हा कुठला न्याय? असा यक्ष प्रश्न हिंगोली तालुक्यातील साटंबा येथील महिलांनी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारपुढे ठेवला आहे.

विदर्भात जन्मलेल्या अनेक मुलींचे विवाह मराठवाड्यातील मुलांशी झाले आहेत. लग्नानंतरही त्या मुलींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो. निवडणुकीत शंभर रूपयांच्या मुद्रांकावर शपथपत्र देवून त्या महिलांना ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविता येते. परंतु, त्यांचे पती व आपत्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. हे असे का व्हावे? याचा कधी सरकारने ७० वर्षात विचारही केला नाही. परंतु, हे वास्तव आहे, म्हणून आज हा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आम्ही कुणबी आणि पती मराठा तर आमच्या मुलांची जात सरकारने सांगावी?, मराठा एकच असतानाही सरकारच्या नजरेत ओबीसी आणि मराठा वेगळे असतील तर अंतरजातीय विवाह  शासनाच्या योजनेतंर्गत ५० हजार आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनचे अडीच लाख रूपये देण्यात यावेत, निवडणुकीसाठी एका बाॅन्डवर जात बदल होवू शकतो तर आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जात बदल का होवू शकत नाही, सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे अथवा सामूहिक फारकत नामा घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी साटंबा येथील कुणबी महिलांनी केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला, पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षण