शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आम्ही कुणबी; पती मराठा, मग आता तुम्हीच सांगा आमच्या मुलांना काही नाही आरक्षण?

By रमेश वाबळे | Updated: October 30, 2023 18:08 IST

साटंबा येथील कुणबी महिलांनी सरकारपुढे ठेवला यक्ष प्रश्न

हिंगोली : विदर्भातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असून, त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभही मिळतो. परंतु, मराठवाड्यात मात्र त्यांच्या अपत्यांना कुणबी आरक्षणाचा लाभ मिळत नाही हा कुठला न्याय? असा यक्ष प्रश्न हिंगोली तालुक्यातील साटंबा येथील महिलांनी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारपुढे ठेवला आहे.

विदर्भात जन्मलेल्या अनेक मुलींचे विवाह मराठवाड्यातील मुलांशी झाले आहेत. लग्नानंतरही त्या मुलींना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो. निवडणुकीत शंभर रूपयांच्या मुद्रांकावर शपथपत्र देवून त्या महिलांना ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविता येते. परंतु, त्यांचे पती व आपत्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. हे असे का व्हावे? याचा कधी सरकारने ७० वर्षात विचारही केला नाही. परंतु, हे वास्तव आहे, म्हणून आज हा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, आम्ही कुणबी आणि पती मराठा तर आमच्या मुलांची जात सरकारने सांगावी?, मराठा एकच असतानाही सरकारच्या नजरेत ओबीसी आणि मराठा वेगळे असतील तर अंतरजातीय विवाह  शासनाच्या योजनेतंर्गत ५० हजार आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनचे अडीच लाख रूपये देण्यात यावेत, निवडणुकीसाठी एका बाॅन्डवर जात बदल होवू शकतो तर आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी जात बदल का होवू शकत नाही, सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे अथवा सामूहिक फारकत नामा घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी साटंबा येथील कुणबी महिलांनी केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला, पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षण