शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:28 IST

वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी, परिसरातील सर्वच जलस्त्रोत आटले आहेत. येथील शेतकरी राजू शेख हे हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहेत.  

लोकमत न्यूज नेटवर्कहयातनगर : वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी, परिसरातील सर्वच जलस्त्रोत आटले आहेत. येथील शेतकरी राजू शेख हे हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहेत.  पावसाच्या लहरीपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, हळद इ. पिके हातची गेली. सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघाला नाही. सिंचनासाठी पाणीच नसल्याने आता शेवटच्या टप्प्यात असलेली हळदही करपून जात आहे.आतापर्यंत हळदीवर केलेला खर्च वाया जाण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकरी हळदीला टँकरने पाणी देऊन जगवण्याची धडपड करत असल्याचे चित्र दिसत आहे.दुष्काळाने पाणीप्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी चिंतातुर दिसत आहेत. शेतकरी राजू शेख यांच्याकडे सिंचनासाठी विहीर व बोअरवेल आहेत. पण डिसेंबरमध्येच जलस्त्रोत आटल्याने आता विकतचे पाणी देऊन पिके वाचवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शेख यांनी तीन एकर हळदीची लागवड केली होती.पाण्याअभावी अडीच एकर हळद करपून गेली. वीस गुंठे हळदीची जोपासना ते पुढच्या वर्षी बेण्यासाठी करत आहेत.यंदा पिकांवर विविध रोगांचे प्रादुर्भाव झाल्याने खर्च प्रचंड वाढला. उत्पन्नाची आशाही मावळली आहे. शासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी राजू शेख यांनी केली आहे.बेण्यासाठी टँकरने पाणी४यंदा तीन एकर जमिनीवर हळद लागवड केली आहे. पाऊस कमी झाल्याने विहीर, बोअरला खडा लागला. त्यामुळे पाण्याअभावी अडीच एकर हळद सोडून दिली. पुढच्या वर्षी बेण्यासाठी हळद रहावी म्हणून अर्धा एकर हळदीला टँकरने पाणी देऊन जतन करत असल्याचे हयातनगर येथील शेतकरी राजू शेख म्हणाले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईFarmerशेतकरी