शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

इसापूरवरून ६६ गावांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:39 IST

तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.पावसाळा संपत आला तरीही ५५ ते ६० टक्केच सरासरी पाऊस पडला आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ४३१.९६ मीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा २७०.८३ दलघमी एवढा आहे. जुलै महिन्यात नांदेडसाठी १.७३९१ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. या धरणातून विदर्भातील ४० कळमनुरी तालुक्यातील २५ गावांना व कळमनुरी शहर अशा एकूण ६६ गावांना या धरणातून पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते. उन्हाळी हंगामातच पिकांसाठी उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडले होते. जून महिन्यांपासून हे दोन्ही कालवे बंद आहेत. कळमनुरी तालुक्यात आतापर्यंत ५२३.९ मि.मी.च पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ७२ टक्के धरण रिकामेच आहे. कडक ऊन व बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने आटते. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरण काही भरत नाही. ८ महिन्यात धरणातील साठा कमी होईल, असे वर्तविण्यात येत आहे. धरणातून दरवर्षी पिके व पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते. पाऊस नसल्याने धरण काही भरत नाही. धरणात येणारी पाण्याची आवक कमीच होत चालली आहे.

टॅग्स :WaterपाणीHingoliहिंगोली