शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

५३ गावांत पाणीनमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:01 AM

जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे.हिंगोली जिल्ह्यात दर महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून अणुजीव तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व लघुप्रयोगशाळेकडे पाणी नमुने पाठविण्यात येतात. यात बऱ्याचदा सर्व गावांतील पाणीनमुने घेतले जात नाहीत. त्यामुळे याबाबत सुधारणा होणे अपेक्षित आहे. या नमुन्यांची तपासणी झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचयातींना सदर स्त्रोताविषयी कळविले जाते. काही ग्रामपंचायती उपाय योजतात. मात्र काही ग्रामपंचायतींकडून त्यावर उपाययोजनाच होत नाहीत. आता उन्हाळा लागला असल्याने टंचाईत अशा स्त्रोतांचा वापर होण्याचा धोका असतो. त्यामुळे या काळात दक्षता घेणे गरजेचे आहे.औंढा तालुक्यातील जवळा बाजार, चिंचोली, पोटा बु., ढेगज, भोसी, जांभळी, अंजनवाडी अशा एकूण आठ गावांमध्ये पाणीनमुने दूषित आढळले आहेत. वसमत तालुक्यात पळसगाव, मुरुंबा, हरगाव, इंजनगाव प., चंदनगव्हाण, साखर कारखाना, बोराळा, भेंडेगाव, नहाद, कुडाळा, पुयनी बु., हिडगाव या बारा गावांत, हिंगोली तालुक्यात कोथळज, सावरखेडा, बासंबा, बळसोंड, सायाळा, नवखा, फाळेगाव, देवठाणा, अंबाळा, अंबाळा तांडा, आडगाव, लिंबाळा, माळहिवरा, खंडाळा, चिंचाळा, वेलतुरा, एकांबा कळमनुरीत येहळेगाव, येगाव, सालेगाव, नांदापूर, येहळेगाव, तेलंगवाडी, कांडली, आडा, बहुर, कुंभारवाडी, येडशी, वाई या १२ गावांत पाणीनमुने दूषित आढळले. तर सेनगाव तालुक्यात जयपूर, कहाकर, वेलतुरा, सिनगी नाका, कारेगाव, वटकळी, सावरखेडा, दाताडा खु., दाताडा बु., पानकनेरगाव या दाहा गावांमध्ये पाणीनमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे.असे आहे चित्र : तालुकानिहाय स्थितीऔंढा तालुक्यात ६३ पैकी ९, वसमतला ८0 पैकी १२, हिंगोलीत ९0 पैकी २0, कळमनुरीत १0७ पैकी १३, सेनगावात ५१ पैकी १३ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वाधिक २५ टक्के पाणीनमुने सेनगाव तालुक्यात दूषित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या तालुक्याने जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. तर हिंगोली तालुक्यात सर्वांत जास्त १७ गावांत पाणीनमुने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यालाही तेवढीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. मात्र दरवर्षीच केवळ कागदी घोडे नाचविले जातात, हा अनुभव आहे.पाणीटंचाई असो वा नसो; शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींना नियमित सूचना दिल्या जातात. मात्र त्यांचे पालन होते की नाही, याची तपासणी कोणीच करत नाही.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य