शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वसमतला ऑक्सिजन संपला, हिंगोलीत संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

हिंगोली : दिवसेंदिवस कोरोनाच्या संकटाचा सामना करणे अडचणींमुळे अवघड बनत चालले आहे. वसमतचा ऑक्सिजन साठा संपल्याने ड्युरा सिलिंडरवर कारभार ...

हिंगोली : दिवसेंदिवस कोरोनाच्या संकटाचा सामना करणे अडचणींमुळे अवघड बनत चालले आहे. वसमतचा ऑक्सिजन साठा संपल्याने ड्युरा सिलिंडरवर कारभार सुरू आहे. गुरुवारी हिंगोलीचाही साठा संपणार असून तो कधी उपलब्ध होईल, याची प्रतीक्षा केली जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात लोकप्रतिनिधी एकमेकांवर कुरघोडी करण्यात मश्गुल असताना वास्तव समस्यांशी लढा देण्यात प्रशासन मात्र हतबल आहे. त्यातही आरोग्य यंत्रणा तर रोज लोकांचे बाेलणे खात असून उपाय करण्यासाठी त्यांच्याकडेही औषधी पुरवठा होत नसल्याने सगळे बेहाल आहेत.

हिंगोली जिल्ह्यात एकूण सहा शासकीय कोरोना रुग्णालये आहेत, जेथे रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवले. यापैकी चार ठिकाणी मोठे ऑक्सिजन टँक आहेत, उर्वरित ठिकाणी केवळ साध्या सिलिंडरवर भागवले जाते. मात्र वसमतचा टँक रिकामा झाला असून हिंगोलीचा उद्यापर्यंत रिकामा होईल. पुढील दिवशी कळमनुरी व बसस्थानक हिंगोलीसमोरील कोविड सेंटरचीही हीच गत होणार आहे. त्यामुळे बुधवारी कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनचा टँक येणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयाच्या टँकची क्षमता १३ टन असून १.६ टन ऑक्सिजन आहे. औंढा रोड हिंगोली कोविड सेंटरलाही १३ टनाच्या टँकमध्ये २.८ टन साठा आहे. कळमनुरीत १३ पैकी २.१ टन साठा आहे. तर वसमतचा १० टनाचा टँक रिकामा झाला. त्यामुळे जिल्ह्यात ४९ टन ऑक्सिजनची गरज असताना उपलब्ध ६.५ टन आहे. त्यातही लहान सिलिंडर नसल्याने एका ठिकाणचा साठा दुसरीकडे नेता येत नाही. तर लहान सिलिंडरवरही रुग्णालय एका दिवसापेक्षा जास्त चालणे अवघड आहे. सध्या वसमतला हेच सिलिंडर लावून कारभार सुरू आहे.

रेमडेसिविरची मागणीच होईना

हिंगोली जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अपुरे इंजेक्शन भेटत असल्याचे दिसत आहे. एकतर इतर ठिकाणी शासकीय यंत्रणांनी आधीच मागणी नोंदविली आहे. शिवाय खाजगी कोविड सेंटर थेट मागणी करीत आहेत. आपल्याकडे या दोन्ही यंत्रणा स्टॉकिस्टच्या भरवशावर दवाखाने चालवित आहेत. शासकीय असो वा खाजगी स्वत: कोणतीच जबाबदारी घेत नसल्याचेच चित्र आहे. शासकीय रुग्णालयाला इंजेक्शन दिले तर लवकर देयके निघत नाहीत, ही अडचण होते. तर खाजगी कोविड रुग्णालये आपल्या रुग्णालयाच्या नावावर इंजेक्शन मागवू शकतात, असे अन्न व औषधी प्रशासनाचे उपायुक्त बळीराम मरेवाड यांनी सांगितले. मात्र तेही स्टॉकिस्टकडे आलेल्या इंजेक्शनवरच भिस्त ठेवून आहेत. त्यातच रुग्णांच्या तुलनेत जिल्ह्यात फक्त चारच स्टॉकिस्ट आहेत. ही संख्याही वाढविणे गरजेचे आहे.

मंगळवारी १२२ तर बुधवारी १० इंजेक्शन

मंगळवारी हिंगोली जिल्ह्याला १२२ इंजेक्शन तर बुधवारी १० मिळाले. दुसरीकडे इतर जिल्ह्यांत शेकड्यांनी नव्हे, तर हजारांनी मिळत आहेत. त्यामुळे श्रेय लाटण्याची कुरघोडी करणारे पुढारी झोपा काढत आहेत का? की फुकटचे श्रेय लाटण्यापुरतीच यांची पुढारकी उरली, असा सवाल आता केला जात आहे. सातत्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणेशी संपर्कात राहून या समस्यांवर मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी किती झटत आहेत, हे देव जाणे. मात्र रुग्णांची व नातेवाईकांची बोंब वाढत आहे.

पुरवठा कमी पडणार नाही

याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, हिंगोली व वसमतला बुधवारी रात्री पुरवठा होईल. सध्या पर्यायी व्यवस्था वापरत आहोत. सगळीकडेच ही पर्यायी व्यवस्था आहे. ऑक्सिजन कमी पडू दिला जाणार नाही. रेमडेसिविरचा तुटवडा आहे. इतर जिल्ह्यांप्रमाणेच आपल्याला मिळत आहेत. तरीही वाढीव पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.