शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती परराष्ट्रनीतीचे अपयश : राजीव सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 13:41 IST

खा. राजीव सातव यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

ठळक मुद्दे पंतप्रधानांनी वुहानला जाऊन चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली़  या सगळ्या प्रपंचानंतर चीन आक्रमणाच्या तयारीत आहे़ हे तर मोदी सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र नीतीचे अपयशच आहे

हिंगोली : केंद्रातील मोदी सरकारची संरक्षण व परराष्ट्र नीती अपयशी ठरली असून, एकाच वेळी देशाच्या चीन, नेपाळ आणि पाकिस्तानी सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, हे त्याचे द्योतक आहे, अशी टीका खा़ राजीव सातव यांनी बुधवारी केली. देशाच्या सीमा असुरक्षित असून परकीय सत्ता डोके वर काढत आहे़  मंगळवारी कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह वीस जवान शहीद झाले असताना केंद्र सरकार कमालीची गोपनीयता पाळत आहे़  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता तरी, मन की बातऐवजी काम की बात करावी, असेही सातव म्हणाले.

देशाचे सर्व शेजारी भारताच्या विरोधात जाहीर टीका करीत आहेत़  भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या नेपाळच्या संसदेने भारताचा भूभाग आपला असल्याचे दाखवले़ आपल्या सैनिकांनाही मारले़  अलीकडे चीनने भारताचा मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे़  चीनचे सैन्य आपल्या भूभाग क्षेत्रात आला आहे़  आता संरक्षण तज्ज्ञांनीही आपला भूभाग चीनने ताब्यात घेतल्याचे मान्य केले आहे़  असे असताना पंतप्रधान मौन बाळगतात, हे आश्चर्यजनक आहे़  कालच २० जवान शहीद झाले़  यात कर्नल दर्जाचे अधिकारी होते़  ही बाब अतिशय गंभीर आहे. वास्तविक पाहता भारतीय लष्कराला सरकारकडून जे आदेश द्यायला हवे होते ते दिले नाहीत़  यामागे भारत सरकारची नेमकी मजबुरी काय? आहे याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, अशी मागणी खा़ सातव यांनी केली़

एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील साबरमती नदीच्या किनारी झोक्यावर बसवून चिनच्या राष्ट्रपतींना मेजवाणी दिली़  इतकेच नाही तर महाबलीपुरम येथे जाऊन चर्चा केली़  अलीकडे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी वुहानला जाऊन चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली़  या सगळ्या प्रपंचानंतर चीन आक्रमणाच्या तयारीत आहे़  हे तर मोदी सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र नीतीचे अपयशच आहे, असे म्हणावे लागेल. भारत सरकारने जशास तसे उत्तर देत चीनने बळकावलेला भूभाग ताब्यात घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खा़ राजीव सातव यांनी दिली़

टॅग्स :ladakhलडाखRajeev Satavराजीव सातवchinaचीनCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधान