शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती परराष्ट्रनीतीचे अपयश : राजीव सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 13:41 IST

खा. राजीव सातव यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

ठळक मुद्दे पंतप्रधानांनी वुहानला जाऊन चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली़  या सगळ्या प्रपंचानंतर चीन आक्रमणाच्या तयारीत आहे़ हे तर मोदी सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र नीतीचे अपयशच आहे

हिंगोली : केंद्रातील मोदी सरकारची संरक्षण व परराष्ट्र नीती अपयशी ठरली असून, एकाच वेळी देशाच्या चीन, नेपाळ आणि पाकिस्तानी सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, हे त्याचे द्योतक आहे, अशी टीका खा़ राजीव सातव यांनी बुधवारी केली. देशाच्या सीमा असुरक्षित असून परकीय सत्ता डोके वर काढत आहे़  मंगळवारी कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह वीस जवान शहीद झाले असताना केंद्र सरकार कमालीची गोपनीयता पाळत आहे़  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता तरी, मन की बातऐवजी काम की बात करावी, असेही सातव म्हणाले.

देशाचे सर्व शेजारी भारताच्या विरोधात जाहीर टीका करीत आहेत़  भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या नेपाळच्या संसदेने भारताचा भूभाग आपला असल्याचे दाखवले़ आपल्या सैनिकांनाही मारले़  अलीकडे चीनने भारताचा मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे़  चीनचे सैन्य आपल्या भूभाग क्षेत्रात आला आहे़  आता संरक्षण तज्ज्ञांनीही आपला भूभाग चीनने ताब्यात घेतल्याचे मान्य केले आहे़  असे असताना पंतप्रधान मौन बाळगतात, हे आश्चर्यजनक आहे़  कालच २० जवान शहीद झाले़  यात कर्नल दर्जाचे अधिकारी होते़  ही बाब अतिशय गंभीर आहे. वास्तविक पाहता भारतीय लष्कराला सरकारकडून जे आदेश द्यायला हवे होते ते दिले नाहीत़  यामागे भारत सरकारची नेमकी मजबुरी काय? आहे याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, अशी मागणी खा़ सातव यांनी केली़

एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील साबरमती नदीच्या किनारी झोक्यावर बसवून चिनच्या राष्ट्रपतींना मेजवाणी दिली़  इतकेच नाही तर महाबलीपुरम येथे जाऊन चर्चा केली़  अलीकडे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी वुहानला जाऊन चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली़  या सगळ्या प्रपंचानंतर चीन आक्रमणाच्या तयारीत आहे़  हे तर मोदी सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र नीतीचे अपयशच आहे, असे म्हणावे लागेल. भारत सरकारने जशास तसे उत्तर देत चीनने बळकावलेला भूभाग ताब्यात घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खा़ राजीव सातव यांनी दिली़

टॅग्स :ladakhलडाखRajeev Satavराजीव सातवchinaचीनCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधान