शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील युद्धजन्य परिस्थिती परराष्ट्रनीतीचे अपयश : राजीव सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 13:41 IST

खा. राजीव सातव यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

ठळक मुद्दे पंतप्रधानांनी वुहानला जाऊन चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली़  या सगळ्या प्रपंचानंतर चीन आक्रमणाच्या तयारीत आहे़ हे तर मोदी सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र नीतीचे अपयशच आहे

हिंगोली : केंद्रातील मोदी सरकारची संरक्षण व परराष्ट्र नीती अपयशी ठरली असून, एकाच वेळी देशाच्या चीन, नेपाळ आणि पाकिस्तानी सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, हे त्याचे द्योतक आहे, अशी टीका खा़ राजीव सातव यांनी बुधवारी केली. देशाच्या सीमा असुरक्षित असून परकीय सत्ता डोके वर काढत आहे़  मंगळवारी कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह वीस जवान शहीद झाले असताना केंद्र सरकार कमालीची गोपनीयता पाळत आहे़  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता तरी, मन की बातऐवजी काम की बात करावी, असेही सातव म्हणाले.

देशाचे सर्व शेजारी भारताच्या विरोधात जाहीर टीका करीत आहेत़  भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या नेपाळच्या संसदेने भारताचा भूभाग आपला असल्याचे दाखवले़ आपल्या सैनिकांनाही मारले़  अलीकडे चीनने भारताचा मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे़  चीनचे सैन्य आपल्या भूभाग क्षेत्रात आला आहे़  आता संरक्षण तज्ज्ञांनीही आपला भूभाग चीनने ताब्यात घेतल्याचे मान्य केले आहे़  असे असताना पंतप्रधान मौन बाळगतात, हे आश्चर्यजनक आहे़  कालच २० जवान शहीद झाले़  यात कर्नल दर्जाचे अधिकारी होते़  ही बाब अतिशय गंभीर आहे. वास्तविक पाहता भारतीय लष्कराला सरकारकडून जे आदेश द्यायला हवे होते ते दिले नाहीत़  यामागे भारत सरकारची नेमकी मजबुरी काय? आहे याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, अशी मागणी खा़ सातव यांनी केली़

एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील साबरमती नदीच्या किनारी झोक्यावर बसवून चिनच्या राष्ट्रपतींना मेजवाणी दिली़  इतकेच नाही तर महाबलीपुरम येथे जाऊन चर्चा केली़  अलीकडे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी वुहानला जाऊन चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली़  या सगळ्या प्रपंचानंतर चीन आक्रमणाच्या तयारीत आहे़  हे तर मोदी सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र नीतीचे अपयशच आहे, असे म्हणावे लागेल. भारत सरकारने जशास तसे उत्तर देत चीनने बळकावलेला भूभाग ताब्यात घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खा़ राजीव सातव यांनी दिली़

टॅग्स :ladakhलडाखRajeev Satavराजीव सातवchinaचीनCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधान