शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाण्यासाठी भटकंती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:46 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना कुचकामी ठरल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलक्ष्मण नाईक तांडा : औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना कुचकामी ठरल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे.लक्ष्मण नाईक तांडा हे १२०० लोकवस्तीचे गाव आहे. तांडयावर गत दोन महिन्यांपासून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. येथे पंधरा वर्षापूर्वी २१ लाख खर्च करून जलस्वराज्य प्रकल्प योजनेतंर्गत नळ योजना सुरु केली होती. मात्र ही नळ योजनाही पाण्याअभावी बंद अवस्थेत आहे. सार्वजानिक पाणीपुरवठ्याची टाकीही शोभेची वास्तू बनली आहे. या योजनेसाठी दरवर्षी तीन ते चार लाखांचा निधी खर्च करण्यात येतो. तरीही ग्रामस्थांची भटकंती कायम आहे. लक्ष्मण नाईक तांडा हे गाव अतीदुर्गंम भागात वसलेले आहे. प्रशासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजना कुचकामी ठरल्याने तांडयावरील ग्रामस्थांना दोन कि.मी. अंतरावरील विहिरीतून जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. येथील सार्वजानिक विहिरीत पाच दिवसाआड पाणी सोडण्यात येते. एकाच दिवसात हे पाणी संपते. त्यानंतर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थांना दोन कि.मी. अंतरावरून पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. शाळेतील लहान मुलांना शाळा सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावालगतच्या सिमेंटी बंधाऱ्यात गावातील घाण पाणी साचत असल्याने त्याच पाण्यावर गुरे आपली तहान भागवत आहेत. त्यामुळे गुरे दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दुष्काळामुळे सारे चिंतित४यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने या भागात जानेवारी महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. दुष्काळामुळे हाताला काम उपलब्ध नसल्याने येथून शेकडो शेतमजुरांचे स्थलांतर झाले आहे. जनावरे व शाळेतील मुलांना सांभाळण्यासाठी वृद्ध गावात शिल्लक आहेत. सार्वजानिक विहिरीवर कुणाला पाणी मिळते तर कुणाला मिळत नाही. अशी स्थिती उद्भवली आहे. पाण्याच्या स्पर्धेत वृद्धांना पाणी मिळत नाही. माय बाप सरकारने आता तरी लक्ष देवून टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीटंचाई