शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल अनंतात विलिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:30 IST

मराठवाड्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल (96) यांचे वृद्धपकाळाने गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज वसमत येथील शासकीय  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसमत (हिंगोली ) : मराठवाड्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल (96) यांचे वृद्धपकाळाने गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज वसमत येथील शासकीय  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विनोद अग्रवाल यांनी त्यांना मुखाग्नी दिला. 

महात्मा गांधी आणि विनोबाच्या विचारणा आयुष्य समर्पित करणारा लढवय्या आणि वसमत च्या शिरपेचातील हिरा असलेले मराठवाड्याचे गांधी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ सर्वोदयी नेते गंगाप्रसाद अग्रवाल यांना हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला. स्वानंद कॉलनी येथील त्यांचे राहते घरून सकाळी  11 वाजता अंत्ययात्रा निघाली.

शहरातून काढलेल्या या अंत्ययात्रेदरम्यान शहरवासीयांनी पुष्पाच्या पाखळ्यांचा वर्षाव केला. यावेळी शहरातील शाळा महाविद्यालये , बाजारपेठ ही दुपारपर्यंत बंद ठेवून गंगाप्रसादजी यांच्या अंत्ययात्रेत शहरातील सर्व नागरिक व्यापारी तसेच मराठवाड्यातून आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी, अनुयायींनी आणि त्यांच्या सहवासात हयात घातलेल्या अनेकांनी शोकाकुल वातावरणात त्यांना कोठा रोडवरील शासकीय इतमामात गंगाप्रसादजी अमर रहे  ! चा जयघोष करीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. 

दरम्यान ,त्यांना विविध पक्ष, सामाजिक संघटना, सर्वोदय चळवळीतील नेत्यांनी आपल्या भाषणातून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांची नात वनिता अग्रवाल यांना गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले.मराठवाड्याची गांधीवादी दीपस्तंभ नेतृत्व अनंतात विलीन झाल्याने वसमत सह मराठवाड्यात शोककळा पसरल्याच्या भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.

गांधी विद्यालयाच्यावतीने दरवर्षी सर्वोदय मंडळातील कार्यकर्त्यांचा दरवर्षी याच दिवशी मेळावा घेऊन त्यांचे विचार पेरण्याचे काम करणार  -  अ‍ॅड . रमेश आंबेकर

वसमत नगरीच्या शिरपेचातला हिरा निखळला हे जीवन समाजासाठीच गेले. आंदोलन म्हणजेच प्रसाद जी अशी भूमिका घेऊन ते जगले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.- डॉ. व्यंकटेश काब्दे

मराठवाड्याच्या बाहेरी त्यांचे मोलाचे कार्य असून बोदवड अग्रवाल समाजाला मोठे उद्बोधक म्हणून ते प्रेरणादायी ठरले.- राकेश अग्रवाल.

प्रसाद जिनी जीवनभर संघर्ष करून समाजाला खूप काही दिले त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली.- सदाशिवराव पाटील, नांदेड

वसमत चे नावलौकिक करणारे गांधीवादी विचाराचे महान कर्तत्व आमच्यातून गेल्याने समाजाची मोठी हानी झाली.- डॉ. एम.आर. क्यातमवार

शेतकऱ्यांसह मजूरदार, दीनदुबळे व मागास घटकांना दिशा देण्यासाठी प्रेरक ठरले.- ब. ल. तामसकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांचा शोक संदेश शिवदास बोड्डेवार यांनी मांडला . स्वातंत्र्य चळवळीतील कीर्तिवंत प्रवाहाचा, समाजवादी विचाराच्या प्रेरणा ज्योतीचा अंत झाला. त्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली.काका जींनी समाज व देशासाठी संपूर्ण आयुष्य घालविले त्यांच्या जाण्याने गांधीवादी व सर्वोदयवादी विचारात पोकळी निर्माण झाली.- मोहन जी अग्रवाल, जालना

सर्वोदय विचाराचा महान गांधीवादी विचारवंत आपल्यातून निघून गेल्याने सूर्य मळवली यासारखा अंधार झाला.- डॉ. अशोक बेलफोडे

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूMarathwadaमराठवाडा