शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संचारबंदीला वंचितचा विरोध; हिंगोलीत पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 19:06 IST

लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या खूप कमी असून त्यासाठी सर्वांना वेठीस धरू नये, अशी मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

ठळक मुद्देटाळेबंदी सुरू झाल्याने अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या खूप कमी असून त्यासाठी सर्वांना वेठीस धरू नये

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. परंतु संचारबंदीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरोध करण्यात आला.  असून ६ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांनी चप्पल व बुटांचे दुकान सुरू ठेवून गांधी चौकात आंदोलन करून शासनाचा निषेध केला. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टाळेबंदीला विरोध करत गांधी चौकात यापूर्वीही आंदोलन केले होते. तसेच या संदर्भाचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर पोलसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. आता पुन्हा संचारबंदीच्या पहिल्या दिवशी ६ ऑगस्ट रोजी वंचितच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून असलेल्या टाळेबंदीमुळे सामान्य कष्टकरी, गवंडी कामगार, मोची, फुटकळ व्यापारी, फळ-फूल विक्रेते अन्य हातगाडी धारकांजवळील जमापूंजी संपली आहे. त्यांना आता रोजगाराशिवाय पर्याय नाही. त्यातच टाळेबंदी सुरू झाल्याने अशा कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या खूप कमी असून त्यासाठी सर्वांना वेठीस धरू नये, अशी मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली. जोपर्यंत लॉकडाऊन उठवला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्यात येणार आहे. आंदोलनात वंचितचे जिल्हा संघटक रवींद्र वाढे, युवक जिल्हाध्यक्ष ज्योतिपाल रणवीर, प्रा.रतन लोनकर, बबन भूक्तर, योगेश नरवाडे, रघुवीर हनवते भीमा सुर्यतळ, प्रल्हाद धाबे, भिम टायगरसेनेचे मनोज डोंगरे, विजय बनसोडे, प्रकाश पठाडे, रोहित उफाडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली