शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

१३ लघुतलाव १00 टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:16 IST

जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या चांगल्या पर्जन्यामुळे २६ पैकी १३ लघुतलाव पूर्णपणे भरले आहेत. उर्वरितपैकी ८ तलाव ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तर ३ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या चांगल्या पर्जन्यामुळे २६ पैकी १३ लघुतलाव पूर्णपणे भरले आहेत. उर्वरितपैकी ८ तलाव ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तर ३ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले आहेत.हिंगोली जिल्ह्यात आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व काही भागात तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगले पर्जन्यमान झाले. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरीही जलसाठे वाढण्यास मदत झाली. काही ठिकाणचे तलाव या पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील ३ तलाव मात्र अजूनही ५0 टक्क्यांच्या आतच राहिल्याचे चित्र आहे. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतही चिंचखेडा, खोलगाडगा, राहाटी येथे १00 टक्के जलसंचय झाला. केवळ खेर्डा कोल्हापुरी बंधाºयातच ३१ टक्के पाणी साठले आहे.हिंगोली जिल्ह्यातील लघुतलावांमध्ये एकूण ५१ दलघमी जलसाठा झाला आहे. यापैकी ४६ दलघमी उपयुक्त साठा आहे. हिंगोली तालुक्यातील पारोळा १00 टक्के, वडद-९९ टक्के, थोरजवळा १00 टक्के, हिरडी ८५ टक्के, सवड १00 टक्के, पेडगाव-४९ टक्के तर हातगाव तलावात ९६ टक्के जलसाठा झाला आहे. सेनगाव तालुक्यातील सवना ९६ टक्के, पिंपरी ९८ टक्के, घोडदरी १00 टक्के, औंढा नागनाथ तालुक्यातील मरसूळ ३0 टक्के, वाळकी १00 टक्के, सुरेगाव ४0 टक्के, औंढा १00 टक्के, सेंदूरसना १00 टक्के, पुरजळ ८५, वंजारवाडी ६५, पिंपळदरी १00, काकडदाभा-१00, केळी ७५ टक्के भरला आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी, देवधरी व बोथी हे तलाव १00 टक्के भरले आहेत. दांडेगाव ९५ टक्के भरला आहे. वसमत तालुक्यातील राजवाडी तलावही १00 टक्के भरला आहे. यावर्षी उन्हाळी पिकांपर्यंतही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होण्याची शक्यता आहे.इसापूर ७८ टक्के, सिद्धेश्वर ९१ टक्क्यांवरकळमनुरी : इसापूर धरण परिसरात परतीचा पाऊस चांगलाच बरसल्याने इसापूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. सध्या इसापूर धरणात ७८.५५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धरणाच्या पाण्याची पातळी ४३८.७१ मीटर असून, उपयुक्त जलसाठा ७५७.३३ दलघमी एवढा आहे.येलदरी धरणात आता ९८ टक्के जलसाठा आहे. या धरणातील एकूण जलसंचय ९१८ दलघमी असून ७९४ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. या धरणातून विद्युतनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून सिद्धेश्वरमध्येही पाण्याचा विसर्ग झाला.सिद्धेश्वरमध्ये इतर मार्गांनीही येणाºया पाण्यामुळे ९१ टक्के जलसाठा झाला असून जिवंतसाठा ७४ दलघमी तर एकूण २४४ दलघमी पाणी आहे. यामुळे यंदा जिल्ह्यालगतच्या सर्वच धरणांत दरवर्षीपेक्षा कित्येक पटीने चांगला जलसाठा झाला आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण