शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

एकमेकांना समजून घेतल्यास संवाद सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:28 IST

जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ असल्याशिवाय कुणालाही सामाजिक जीवनात चांगल्या पद्धतीचे काम करता येत नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असे नाही. त्यामुळे राग, त्रागा केल्यास स्वत:ला आणि इतरांनाही त्रास आहे. मात्र समजून घेत समोरच्याशी संवाद साधला तर काम करणे सुकर जाते, असे खा.अ‍ॅड.राजीव सातव म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ असल्याशिवाय कुणालाही सामाजिक जीवनात चांगल्या पद्धतीचे काम करता येत नाही. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असे नाही. त्यामुळे राग, त्रागा केल्यास स्वत:ला आणि इतरांनाही त्रास आहे. मात्र समजून घेत समोरच्याशी संवाद साधला तर काम करणे सुकर जाते, असे खा.अ‍ॅड.राजीव सातव म्हणाले.ते म्हणाले, कुठल्याही क्षेत्रात एखादी भूमिका चांगल्या पद्धतीने व पटेल अशा पद्धतीने मांडली तर लोकांना ते आवडते. राग, चिडचिडेपणा नसला तर लोकांच्या मनाचा ठाव घेवून त्याच्या कलाने वागता येते. त्यामुळे समोरच्याचे समाधान होते. लोकांच्या अपेक्षांनुसार काम करण्याची भूमिका ठेवल्यास आपल्याला रागापर्यंत पोहोचण्याची गरजच पडत नाही. त्यांना समजेल अशा पद्धतीने वागताना सयंमाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर समोरच्यालाही चांगले वाटते. तरीही मानवी प्रवृत्तीत राग येणे साहजिक आहे. मात्र अशावेळी भीतीपोटी म्हणून नव्हे, तर आणखी चुका टाळण्यासाठी माघार घेणेच अधिक चांगले. कारण रागामुळे माणसे जोडण्याऐवजी दूर जातात. राजकीय क्षेत्रात काम करताना रोज शेकडो लोकांशी भेटी-गाठी होतात. नवनव्या समस्या समोर येतात. त्या सोडविताना कधी नियम-अटींचा विलंब होतो. अशावेळी राग नियंत्रणात ठेवत काम करून घ्यायचे म्हणजे कसरत होते.मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमिवर प्रत्येकाने गुड बोला, गोड बोला आणि तसेच चांगले वागूया, असा संकल्प करण्याची गरज आहे. लोकमतने हाती घेतलेल्या या उपक्रमास माझ्या शुभेच्छा. खरेतर सर्वच दृष्टिने हा उपक्रम चांगला, आरोग्यदायी व अनुकरणीय आहे.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक