शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हिंगोलीत आगीत दोन दुकाने खाक; अडीच ते तीन कोटींच्या नुकसानाचा अंदाज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:24 IST

शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

हिंगोली : शहरातील गांधी चौक भागातील कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या दुकानातील साहित्य पूर्णपणे खाक झाले असून इमारतही क्षतीग्रस्त झाली आहे.

गांधी चौक भागात प्रदीप पद्माकर दोडल यांचे खुप जुने प्रतिष्ठान असलेल्या कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. रात्र असल्याने ही आग वेळीच लक्षात आली नाही. ती निदर्शनास येईपर्यंत आतमध्ये सर्व कापडच असल्याने तिचा चांगलाच भडका उडाला होता. बघ्यांची गर्दी जमली असतानाही आगीच्या लोळापुढे कुणाचेच काही चालत नव्हते. तरीही काहींनी हिंमत करून शटरला दोरी बांधून ती दुरून ओढली. यात एक-दोन जण जखमी झाले. शिवाय हिंगोलीच्या अग्नीशामक दलाचा बंबही आला. त्याचबरोबर कळमनुरीचा बंबही बोलावण्यात आला होता. खाजगी टँकरही लावले होते. 

स्थानिक नागरिक, अग्नीशामक दलाचे कर्मचारी अशा सर्वांनीच आग विझविण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली. मात्र तरीही जवळपास साहित्य, रेडिमेड कापडाचे दालन, लग्नबस्ता, साड्या, शुटींग, शर्टिंग अशा तिन्ही मजल्यांवरील माल जळून खाक झाला. आग आटोक्यात येईपर्यंत मोठे नुकसान झाले होते. तर आजूबाजूच्या दुकानांनाही आगीने घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र एका दुकानातील थोडेबहुत नुकसान झाले आहे. ते नेमके किती? याचा अंदाज नाही. आगीची तीव्रता एवढी जास्त होती की, काचा वितळल्या, लोखंडी गजाळ्याही वाकल्या. घटनास्थळी आ.तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, पोनि अशोक मैराळ यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचा-यांनी पाहणी केली.  तर अग्निशमन दलाच्या पथकासह पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाजूच्या दुकानातील साहित्य काढण्यास मदत केली. त्याही दुकानाचे काही प्रमाणात नुकसान झाले. 

अनर्थ टळलारात्री दोनच्या सुमारास व्यापारपेठेतील अनेकांनी आग विझविण्यासाठी तसेच ती इतरत्र भडकणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मदत केली. अन्यथा मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात ही आग लागली होती. शिवाय या भागात कापड दुकानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ही आग वेळीच आटोक्यात आली नसती तर ती इतर दुकानांमध्ये पसरण्याची भीती होती. तर दुकानाजवळ असलेल्या रेणुकादास दोडल यांच्याही दुकानाला आस लागल्याने त्याच्या काचा फुटल्या. दुकानातील साहित्याचे नुकसान झाले नसले तरी समोरून मात्र पूर्ण दुकान जळून खाक झाले. 

ज्यूस सेंटरलाही आगअष्टविनायक चौक परिसरातील सागर ज्यूस सेंटरमध्येही शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात ज्यूस तयार करण्याच्या मशिन, फ्रीजर, फर्निचर, शीतपेयांच्या कॅरेटचे आगीमुळे नुकसान झाले आहे. एकाच दिवशी दोन घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :fireआगHingoli policeहिंगोली पोलीस