शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

फिल्टरमुळे माठ व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:45 IST

ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक बाटलीबंद किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावागावात पारंपरिक माठ विक्रीच्या व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक बाटलीबंद किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावागावात पारंपरिक माठ विक्रीच्या व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे.कमी पैशात सहजगत्या शुद्ध पाणी मिळते शिवाय ते थंड करण्यासाठी घरातील फ्रीजचा मार्ग मोकळा असल्याने आजघडीला गरिबांचा फ्रीज समजला जाणाऱ्या माठाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसून येते. शहरातील कुंभार गल्लीत पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जातात. हे माठ बाजारात विक्रीसाठी आणले जातात. मात्र मागील काही वर्षापासून माठाच्या मागणीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाला केवळ पाच ते दहा माठांची विक्री होते. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सवलतीच्या दरात फ्रीज तसेच संबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचा कल या आधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे पाण्याच्या जारला मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे औढा शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी आरओ प्लांट सुरू झाले आहे. काळानुसार या व्यवसायालाही चार चांद लागल्याचे दिसून येत आहे. सुमारे १० ते १५ ठिकाणी पाणी शुद्ध करून ते जारमध्ये भरून मिळते. वीस लिटर शुद्ध पाणी अवघ्या दहा ते वीस रुपयांना घरपोच मिळते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात माठाएवजी जारच दिसून येत आहेत. याशिवाय घरोघरी शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसवलेले आहेत. पूर्वी दीडशे रुपयांना मिळणारा माठ नागरिक दोन वर्षे वापरत होते. मात्र सध्या रोज जारच्या पाण्यासाठी जास्त खर्च करण्याची तयारी नागरिकांची असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम माठ विक्री व्यवसायावर झाला आहे. माठाला मागणी कमी होत असून व्यवसायावर मंदीचे सावट दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषण