शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

तूर पाचशेंनी घसरली, सोयाबीनही पडत्या भावातच; भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची निराशा

By रमेश वाबळे | Updated: January 23, 2024 19:40 IST

भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे.

हिंगोली : येथील मोंढ्यात १० हजार ३०० रूपयांचा पल्ला गाठलेल्या तुरीच्या दरात मंगळवारी पाचशे रूपयांनी घसरण झाली. तर सोयाबीनही सध्या पडत्या भावातच विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

यंदा सोयाबीनसह तूर, कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. अत्यल्प पाऊस, पिके ऐन भरात असताना किडीचा प्रादुर्भाव यामुळे फटका बसला. उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात तरी समाधानकारक भाव मिळेल अशी आशा होती. मात्र, लागवड आणि उत्पादनाचा विचार केल्यास यंदा सोयाबीन कवडीमोल दरात विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. डिसेंबरमध्ये दोन- तीन दिवस सोयाबीनने पाच हजारांचा पल्ला गाठला. परंतु, त्यानंतर तीनशे ते चारशेंनी भाव घसरले. पुन्हा भाव वाढतील अशी आशा होती. मात्र, निराशा होत आहे. सध्या सरासरी ४ हजार ५०० रूपयांवर भाव जात नसल्याचे चित्र आहे.

तुरीला मात्र समाधानकारक भाव मिळत आहे. २० जानेवारी रोजी तुरीला किमान ९ हजार ६५० ते १० हजार ३०० रूपये भाव मिळाला होता. परंतु, उत्पादनात घट झाल्यामुळे या भाववाढीचा फारसा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच मंगळवारी क्विंटलमागे जवळपास पाचशे रूपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजी पुढे येत होती.

दोन दिवसांच्या बंदमुळे आवक वाढली...रविवारी हक्काची सुट्टी आणि सोमवारी अयोध्येतील सोहळ्यानिमित्त बाजार समिती प्रशासनाने मोंढा, मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे मंगळवारी सोयाबीनसह तुरीची आवक वाढली होती. सोयाबीन ८०० क्विंटल तर तुरीची आवक ३०० क्विंटल झाली होती. परंतु, भावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

सोयाबीन दराची कोंडी कायम...भावात वाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले आहे. परंतु, भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असून, भाव वाढीची अपेक्षा आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता कमी असून, मागील तीन महिन्यांपासून दरवाढीची कोंडी कायम असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली