शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पणन कायद्यातील दुरूस्ती विरोधात हिंगोली जिल्ह्यातील सहा बाजार समित्यातील व्यवहार बंद

By रमेश वाबळे | Updated: February 26, 2024 17:49 IST

सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले जात आहे.

हिंगोली : राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार पणन कायद्यात बदल करण्यात येत आहे. याला मात्र बाजार समित्यांनी विरोध दर्शवित २६ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बंद पुकारला. यामुळे जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले. परिणामी, कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली.

सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले जात आहे. हे विधेयक म्हणजे राज्यातील ज्या बाजार समित्यांमध्ये इतर राज्यातून ३० टक्क्यांहून अधिक माल येत असल्यास अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला जाणार आहे. त्याच बरोबर या बाजार समित्यांवर शासन नियुक्त मंडळ कार्यरत असणार आहे. यात बहुतांश बाजार समित्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. जर असे झाले तर बाजार समितीवर अवलंबून असलेले शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी या घटकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारकडून होत असलेल्या पणन कायद्यातील दुरूस्तीला विरोध दर्शविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह वसमत, जवळा बाजार, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि त्यातंर्गत उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 

हळद मार्केट यार्ड, मोंढ्यात शुकशुकाट...मराठवाड्यासह सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात बंदमुळे २६ फेब्रुवारी रोजी शुकशुकाट होता. तसेच मोंढ्याही अशीच परिस्थिती पहायला मिळाली. हा परिसर नेहमी शेतकरी, हमाल, मापारी, व्यापाऱ्यांच्या गर्दीने गजबजलेला असतो. सोमवारीच्या बंदमुळे मात्र सर्वत्र शुकशुकाट होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarketबाजारagitationआंदोलन