शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पणन कायद्यातील दुरूस्ती विरोधात हिंगोली जिल्ह्यातील सहा बाजार समित्यातील व्यवहार बंद

By रमेश वाबळे | Updated: February 26, 2024 17:49 IST

सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले जात आहे.

हिंगोली : राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार पणन कायद्यात बदल करण्यात येत आहे. याला मात्र बाजार समित्यांनी विरोध दर्शवित २६ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बंद पुकारला. यामुळे जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले. परिणामी, कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली.

सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले जात आहे. हे विधेयक म्हणजे राज्यातील ज्या बाजार समित्यांमध्ये इतर राज्यातून ३० टक्क्यांहून अधिक माल येत असल्यास अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला जाणार आहे. त्याच बरोबर या बाजार समित्यांवर शासन नियुक्त मंडळ कार्यरत असणार आहे. यात बहुतांश बाजार समित्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे. जर असे झाले तर बाजार समितीवर अवलंबून असलेले शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी या घटकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरकारकडून होत असलेल्या पणन कायद्यातील दुरूस्तीला विरोध दर्शविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह वसमत, जवळा बाजार, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि त्यातंर्गत उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 

हळद मार्केट यार्ड, मोंढ्यात शुकशुकाट...मराठवाड्यासह सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या हिंगोली बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डात बंदमुळे २६ फेब्रुवारी रोजी शुकशुकाट होता. तसेच मोंढ्याही अशीच परिस्थिती पहायला मिळाली. हा परिसर नेहमी शेतकरी, हमाल, मापारी, व्यापाऱ्यांच्या गर्दीने गजबजलेला असतो. सोमवारीच्या बंदमुळे मात्र सर्वत्र शुकशुकाट होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarketबाजारagitationआंदोलन