शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वरुणराजाच्या कृपेने परंपरा अबाधित; वाईचा महापोळा हजारो बैलजोड्यांच्या साक्षीने साजरा

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 3, 2024 16:35 IST

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची वाई येथे बैलजोडी आणून श्री गोरक्षनाथाचे दर्शन घेण्याची परंपरा शेकडो वर्षांची वर्षापासूनची आहे.

- महेबूब पठाण

शिरडशहापूर (जि. हिंगोली) : वाई गोरक्षनाथ येथे पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी बैलपोळा साजरा करण्याची अनेक शेकडो वर्षांपासून प्रथा असून, त्या प्रथेप्रमाणे वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळ्याला हिंगोली जिल्ह्यासह शेजारच्या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या ‘सर्जा-राजाची’ जोडी आणून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. श्री गोरक्षनाथाच्या दर्शनासाठी ऐतिहासिक बैलपोळ्याला जवळपास ८ ते १० हजार बैलजोड्या आल्या होत्या.

२ सप्टेंबर रोजी बैलपोळा साजरा केल्यानंतर करीच्या दुसऱ्या दिवशी बैलपोळा भरविण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यावर्षी पोळ्याच्या तोंडावरच पावसाचे आगमन झाल्यामुळे पोळा सण साजरा होतो की नाही, असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु करीच्या दुसऱ्या दिवशी पावसाने उघाड दिल्यामुळे वाई गोरक्षनाथ येथे पारंपरीक बैलपोळा साजरा करता आला. प्रारंभी उपस्थित शेतकऱ्यांनी श्री गोरक्षनाथ मंदिरात विधिवतपणे पूजा करुन नंतर बैल पोळ्याला सुरुवात केली. यानंतर बैलांची पूजा करुन श्री गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्व शेतकरी तयार झाले आणि वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढत बैलपोळा सण साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या येथे दर्शनासाठी आणल्या होत्या. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

३ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता संस्थांनच्या वतीने श्री गोरक्षनाथ यांना महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तसेच वाई गोरखनाथ ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या शेतकऱ्यांसाठी महाप्रसाद, चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बैलपोळा लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुधनासाठी शिबीर घेण्यात आले. तसेच दर्शनासाठी आणलेल्या सर्व बैलांचे लसीकरण करण्यात आले. बैलपोळ्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन कुरुंदा पोलिस ठाण्याच्या वतीने वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वाई येथे बैल आणल्यांतर आजार होत नसल्याची धारणावाई येथे बैलजोडी आणून श्री गोरक्षनाथाचे दर्शन घेण्याची परंपरा शेकडो वर्षांची वर्षापासूनची आहे. श्री गोरक्षनाथाच्या मंदिराला प्रदक्षणा घातली की, बैलांना कोणताही आजार होत नाही, बैल शेतीकामासाठी तंदुरुस्त राहतात, अशी धारणा आहे. त्यामुळे तर दरवर्षी तिन्ही जिल्ह्यांतील शेतकरी आपल्या बैल, गाय व वासरांना येथे घेऊन येतात. ही परंपरा अनेक वर्षापासून वाई गोरक्षनाथ येथे सुरु आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारोतराव कदम महाराज, संभाजी निर्मळ, दुलबाराव कदम, शामराव कदम, बाबूराव कदम, रावसाहेब कदम, माणीकराव कदम व पंचक्रोशीतील नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, फौजदार रहीम चोधरी, फोजदार कारामुगे, जमादार बालाजी जोगदंड, शंकर भिसे, विकास राठोड आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली