शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तीन वर्षांपासून नळयोजना बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:44 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील गावात व वाडी- तांड्यावरील विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे यावर्षी भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील ३ वर्षांपासून २३ गाव प्रादेशिक नळयोजना बंद आहे. पाणीटंचाईमुळे ही योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील गावात व वाडी- तांड्यावरील विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे यावर्षी भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील ३ वर्षांपासून २३ गाव प्रादेशिक नळयोजना बंद आहे. पाणीटंचाईमुळे ही योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी केली आहे.यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शिरडशहापूर, सारंगवाडी येथील नळयोजनेवरील विहिरींची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने सध्या ६ ते ७ दिवसाआड नळांना पाणीपुरवठा गावकऱ्यांना होत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून वारे सुटत असल्यामुळे गावातील हातपंपाचे पाणी कमी झाले आहे. तसेच गावातील एखादा हातपंप सोडला तर सर्वच हातपंप पाण्याअभावी बंद अवस्थेत आहेत. नळयोजनेवरील विहिरींचे पाणीपातळी कमी झाल्याने बाजूलाच असलेल्या सारंगवाडी व आश्रमशाळेच्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने २ ते ३ दिवसांपासून पाणी घेण्यात आले आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद हिंगोलीमार्फत राबविण्यात येणारी २३ गाव पाणीपुरवठा योजनेवर जवळपास २५ गावे अवलंबून आहेत; परंतु या योजनेचे पाणी गेल्या ३ वर्षांपासून बंद झाल्याने व या योजनेंतर्गत समाविष्ठ असलेल्या गावांना दुष्काळात पर्यायी व्यवस्थेसाठी शासनाकडून कोणताच निधी खर्च करण्यात येत नसल्याने ही सर्वच गावे तहानलेलीच असतात.यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच परिसरातील टाकळखोपा, लक्ष्मणनाईक तांडा, काळापाणीतांडा, संघनाईक तांडा, सावरखेडा, काठोडा, मार्डी, वाई, गोरखनाथ, चोंढी स्टेशन, चोंढी शहापूर आदी गावे त्या योजनेवर अवलंबून आहेत. उर्वरित काही गावे जलस्वराज्य योजना या दुरूस्तीअभावी बंद आहे.दरवर्षी उन्हाळा सुरू होताच टाकळखोपा व तांड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टाकळखोपा येथे टँकर सुरू आहे. सध्या सर्वच गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील विहिरींना पाणी नसल्यामुळे खासगी जलस्त्रोतांवर पाण्यासाठी झुंबड उडत आहे. वाई गोरखनाथ येथे सेंदूरसना तलावातून व राजवाडी येथून गावातील विहिरीत पाणी सोडण्यात येत होते; परंतु ती योजनाही नादुरूस्त असल्यामुळे गावातील लोकांना आज पाण्यासाठी शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गावात येणाऱ्या भाविकांना प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही. गावात कार्यक्रम असला तर नागरिक मोफत टँकरने पाणीपुरवठा करतात.२३ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद झाल्यापासून महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद टंचाई उपाययोजनेबद्दल फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्यामुळेच गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई