शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून नळयोजना बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:44 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील गावात व वाडी- तांड्यावरील विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे यावर्षी भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील ३ वर्षांपासून २३ गाव प्रादेशिक नळयोजना बंद आहे. पाणीटंचाईमुळे ही योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील गावात व वाडी- तांड्यावरील विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे यावर्षी भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील ३ वर्षांपासून २३ गाव प्रादेशिक नळयोजना बंद आहे. पाणीटंचाईमुळे ही योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ व सरपंचांनी केली आहे.यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शिरडशहापूर, सारंगवाडी येथील नळयोजनेवरील विहिरींची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने सध्या ६ ते ७ दिवसाआड नळांना पाणीपुरवठा गावकऱ्यांना होत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून वारे सुटत असल्यामुळे गावातील हातपंपाचे पाणी कमी झाले आहे. तसेच गावातील एखादा हातपंप सोडला तर सर्वच हातपंप पाण्याअभावी बंद अवस्थेत आहेत. नळयोजनेवरील विहिरींचे पाणीपातळी कमी झाल्याने बाजूलाच असलेल्या सारंगवाडी व आश्रमशाळेच्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने २ ते ३ दिवसांपासून पाणी घेण्यात आले आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद हिंगोलीमार्फत राबविण्यात येणारी २३ गाव पाणीपुरवठा योजनेवर जवळपास २५ गावे अवलंबून आहेत; परंतु या योजनेचे पाणी गेल्या ३ वर्षांपासून बंद झाल्याने व या योजनेंतर्गत समाविष्ठ असलेल्या गावांना दुष्काळात पर्यायी व्यवस्थेसाठी शासनाकडून कोणताच निधी खर्च करण्यात येत नसल्याने ही सर्वच गावे तहानलेलीच असतात.यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच परिसरातील टाकळखोपा, लक्ष्मणनाईक तांडा, काळापाणीतांडा, संघनाईक तांडा, सावरखेडा, काठोडा, मार्डी, वाई, गोरखनाथ, चोंढी स्टेशन, चोंढी शहापूर आदी गावे त्या योजनेवर अवलंबून आहेत. उर्वरित काही गावे जलस्वराज्य योजना या दुरूस्तीअभावी बंद आहे.दरवर्षी उन्हाळा सुरू होताच टाकळखोपा व तांड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी टाकळखोपा येथे टँकर सुरू आहे. सध्या सर्वच गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील विहिरींना पाणी नसल्यामुळे खासगी जलस्त्रोतांवर पाण्यासाठी झुंबड उडत आहे. वाई गोरखनाथ येथे सेंदूरसना तलावातून व राजवाडी येथून गावातील विहिरीत पाणी सोडण्यात येत होते; परंतु ती योजनाही नादुरूस्त असल्यामुळे गावातील लोकांना आज पाण्यासाठी शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गावात येणाऱ्या भाविकांना प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही. गावात कार्यक्रम असला तर नागरिक मोफत टँकरने पाणीपुरवठा करतात.२३ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद झाल्यापासून महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद टंचाई उपाययोजनेबद्दल फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्यामुळेच गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई