शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

हिंगोली जिल्ह्यात दोन वर्षांत अपघातात २७० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:15 IST

जिल्हाभरात विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती जरी झाली असली तरी त्या रस्त्याचा साईड भरणाच केलेला नाही. त्यामुळे दिवसागणिक अपघात होत आहेत. दोन वर्षात २७० जणांचे बळी गेले आहेत. एका दिवसाला दोन ते तीन अपघात आणि एकाचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीवरुन पुढे आले आहे

ठळक मुद्दे नियमाचे पालन न करणे, रस्त्यावरील खड्डे, मोबाईल, मद्यपान इ. चा फटका

संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हाभरात विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती जरी झाली असली तरी त्या रस्त्याचा साईड भरणाच केलेला नाही. त्यामुळे दिवसागणिक अपघात होत आहेत. दोन वर्षात २७० जणांचे बळी गेले आहेत. एका दिवसाला दोन ते तीन अपघात आणि एकाचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीवरुन पुढे आले आहे‘वाहने सावकारास चालवा’, मद्यपान करुनये, ‘अतिघाई संकटात नेई’, ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’ यासारखे वाहनचालकांना संदेश देणारे फलक रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. परंतु त्यांचा खरोखरच चालकांकडून वापर होतो का? हाही एक गंभीर प्रश्नच आहे. त्यामुळे ते फलक केवळ शोभेचीच वस्तू बनलेले आहेत. आता तर चक्क अपघातस्थळी रबर स्टेबर टाकलेले आहे. तेथे वाहन येताच चालक खडबडून जागे होऊन आपल्या वाहनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तरी निदान तेथे अपघाताची आकडेवारी घटली आहे. आजही भरधाव वेगाने वाहने चालवणाºयांची संख्या कमी नाही. कधी - कधी तर अचानक वन्य प्राणीही रस्त्यावर आडवे आले तर ब्रेक दाबला तर अपघात टळू शकतो मात्र असे क्वचित ठिकाणीच होते.त्यामुळे रस्त्यावर आडवे आलेल्या वन्य प्राण्यांमुळेही अनेकदा अपघात घडले आहेत.विशेष बाब म्हणजे रस्ते बनविलेले असले तरीही त्याचा साईड भरणाच केला नसल्याने वाहनाचा रस्त्याच्या कडेला जराही तोल गेला की, वाहन उलटत आहेत.विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी हिंगोली - नांदेड महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला एक ते दीड फूट खोली निर्माण झाल्यामुळे चालक वाहन खाली उतरवित नाहीत.अचानक उतरविलेच तर ते उलटल्याशिवाय राहत नाही. तसेच मद्यपान करुन वाहन चालविणाºयांचीही संख्या कमी नाही. मद्यपान केल्यानंतर बेदरकार वाहने चालविल्याने विशेषत: दुचाकीस्वार अनेकदा अपघातात सापडतात.जनजागृती : महामार्गावर सर्वाधिक नोंदपोलीस प्रशासनासह विविध सामाजिक संस्थाकडून अपघात टाळता यावेत, यासाठी वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. या अभियानातून अनेकदा वाहन चालविताना घ्यावयाची काळजी नियमाचे पालन केल्यास अपघात कसा टाळता येऊ शकतो आदी लहान-सहान बाबी वाहनचालकांच्या लक्षात येण्यासाठी समजावून सांगितल्या जातात. मात्र मोजकेच चालक वेळोवेळी सांगितलेल्या नियमांचे पालन करतात. इतर पालनच करीत नसल्याने खºया अर्थाने जनजागृती होत नसावी की चालकच समजून घेत नसावेत? असाही एक प्रश्न आहे.

साबांचे दुर्लक्षजिल्ह्यातील खड्डे अद्याप साबांने दुर्लक्ष केलेले नाहीत. त्यामुळे आजही रात्री - अपरात्री प्रवास करणारी व्यक्ती घरापर्यंत पोहोचेल की नाही ? याचा भरोसा नाही. एका ठिकाणावरुन दुसºया ठिकाणी निघालेल्या व्यक्तीच्या घरची मंडळी सतत संपर्कात राहत असल्याचेही चित्र आहे.

बसचेही अपघातदोन महिन्यात एसटी बसचेही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यामध्येही काही प्रवाशांना जिव गमवावा लागला आहे. सर्वच अपघातांची संख्या कमी होण्यासाठी चांगल्या रस्त्यांसोबतच चालकही जागरुक असले पाहिजे.