शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

थरारक! रान डुक्कर पुढे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार पुलावरून खाली लटकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:06 IST

पुलाला अर्धवट कठडा असल्याने झाला अपघात; चालक जखमी असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे

- रमेश कदम

आखाडा बाळापूर ( हिंगोली): रान डुक्कर अचानक पुढे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ( एम. एच .38 एडी 7394) पुलावरून थेट ओढ्यात कोसळता कोसळता राहिली. मात्र, कार पुलाच्या कठड्याला लटकत असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. हा अपघात आज, गुरुवारी ( दि. २४ ) पहाटे ५ वाजता बाळापुर गावाजवळ झाला. अपघातात चालक जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी ओढ्यावरील पुलाचे कठडे तुटलेले असल्याने छोटेमोठे अपघात होत असतात, आज पहाटे देखील कठडा नसल्यानेच कार खाली कोसळल्याचे नागरिकांनी सांगितले. 

इरिगेशन कॅम्प ते बाळापूर जाणाऱ्या रस्त्यावर बाळापुरजवळ एक मोठा ओढा आहे. या ओढ्यावर पुल असून अनेक वर्षांपासून तयारील कठडे तुटलेले आहेत. त्यामुळे येथे वारंवार अपघात घडत असून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक कार ( एम.एच.38 ए डी 7394 ) या मार्गे बाळापूरकडे जात होती. यावेळी अचानक समोर रानडुक्कर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलावरून थेट ओढ्यात कोसळली. मात्र, कठड्याच्या एका अँगलला अडकल्याने कार कशीबशी पुलाला लटकली. 

काच फोडून चालक बाहेरअपघात कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या अर्धवट फुटलेल्या काचा तोडून बाहेर पडत चालकाने आपला जीव वाचवला. यात चालकाच्या डोके, छाती, पायास गंभीर दुखापत झाली. दरम्यान, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाला असला तरी पोलिसांना मात्र याची खबरबात नव्हती. दहा वाजण्याच्या सुमारास बीट जमादार शेख अन्सार घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी सदर गाडी ही कृष्णापूर येथील जितेंद्र पाईकराव यांच्या मालकीची आहे. चालकाकडून हा अपघात झाला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली